“मुंबई-महाराष्ट्रातील भाजपाचे किमान सात मंत्री, १५ आमदार-खासदार, भाजपास अर्थपुरवठा करणारे बिल्डर्स ‘मनी लॉण्डरिंग’ प्रकरणात आत जातील असे गुन्हे त्यांच्या नावावर आहेत, पण ‘ईडी’ स्वतःच आरोपींची निवड करते हे न्यायालयाचे म्हणणे अशावेळी सत्य ठरते,” असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने संजय राऊत यांच्या सुटकेनंतर भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल केला आहे. पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. यानंतर बुधवारी सायंकाळी राऊत यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. काल म्हणजेच बुधवारी राऊत यांनी ‘मातोश्री’वर जाऊन ठाकरे कुटुंबाची भेट घेतली. या सुटकेनंतर आज उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून संजय राऊत अटक आणि सुटका प्रकरणावर परखड भाष्य करण्यात आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा