खोके सरकार अजूनही राजकारणात अडकलं आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही त्यांनी मदत केलेली नाही अशी टीका ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. खरे मुख्यमंत्री कोण? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. दरम्यान होर्डिंगच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आता आपल्याला मळमळायला लागलं आहे असं उपहासात्मकपणे म्हटलं. मुंबईत ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित होते. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“खरे मुख्यमंत्री कोण आहेत? हे सरकार अजूनही राजकारणातच अडकलं आहे. घटनाबाह्य सरकारने कामही करायचं असतं, हे त्यांना अजूनही जाणवलेलं नाही. राज्यात केवळ राजकीय घोषणा दिल्या जात आहेत. पण जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Uddhav Thackeray Speech News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर, “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा…”

“…त्यांना शरम उरली नाही” आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका!

“४० दिवसांनी पहिल्या मंत्र्यांची यादी जाहीर झाली होती. पालकमंत्री जाहीर होण्याआधी बंगल्याचं वाटप झालं होतं. हे सरकार घटनेच्या विरोधात आहे हे मान्य करायला हवं. घटनाबाह्य सरकार निर्णय घेत आहे हे दुर्दैवी आहे,” असंही ते म्हणाले.

बॅनरबाजीवरुन टीका

“या सरकारला ‘घोषणा सरकार’, ‘खोके सरकार’ अशी अनेक नावं मिळाली आहेत. पण यांना कोणतीही लाज वाटत नाही. आपण काम करणं गरजेचं आहे, हेही ते विसरून गेले आहेत, राज्यातील प्रत्येक महामंडळाच्या बस स्थानकावर शिंदे सरकारचे होर्डिंग्स लागले आहेत. या होर्डिंगसाठी पैसे दिले आहेत की नाही? हे अजूनही माहीत नाही. दिले असतील तर कुणी दिले? आणि दिले नसतील तर याची नुकसानभरपाई कोण करणार? हेही माहीत नाही. शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बॅनर लावले आहेत. पण महापालिकेकडून कुठेही कारवाई केली जात नाही. एवढे सगळे राजकीय होर्डिंग्स पाहून मला मळमळायला लागलं आहे,” असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

“खरं तर, सणासुदीपासून राजकारण बाजुला ठेवलं पाहिजे. पण सर्वत्र उधळपट्टी सुरू आहे. त्यांनी महागाईवर, रुपयाच्या पडत्या किमतीवर, शेतकऱ्यांच्या नुकसानीवर, बेरोजगारीवर बोलायला हवं. पण प्रश्नांवर कुणीही बोलायला तयार नाही. केवळ उधळपट्टी सुरू आहे. निव्वळ घोषणा दिल्या जात आहेत. दहिहंडीच्या काळातही एवढ्या घोषणा दिल्या, मात्र त्यातील एकही घोषणा अंमलात आणली नाही. फक्त खोटं बोलत राहायचं, हेच सरकारचं धोरण आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

Story img Loader