मुंबई : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे अवघ्या ०.५९ मताने पराभूत झाल्याने त्यांच्या राजकीय कारकीर्दीला मिळालेली कलाटणी, मतांच्या फाटाफुटीमुळे शेकापचे गणपतराव देशमुख यांचा पराभव, विजयी उमेदवारापेक्षा पहिल्या पसंतीची अधिक मते मिळूनही विद्यमान परिवहनमंत्री अनिल परब यांचा झालेला पराभव किंवा पुरेशी मते असतानाही काँग्रेस उमेदवाराचा पराभव अशा विविध धक्कादायक निकालांची परंपरा राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेतही कायम राहिली आहे.

विधान परिषदेच्या सोमवारी होणाऱ्या निवडणुकीत दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली आहे. कोण पराभूत होणार याचीच चर्चा रंगली आहे. गेल्याच आठवडय़ात सुमारे दोन दशकांनंतर झालेल्या प्रत्यक्ष निवडणुकीत शेवटपर्यंत उत्कंठा कायम राहिली. साडेआठ तास विलंबाने सुरू झालेल्या मतमोजणीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे विजय प्राप्त केला तर शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. राज्यातील विधान परिषद निवडणुकीतही असेच काही धक्कादायक निकाल लागले आहेत.

Accident
Accident : दाट धुक्याने घात केला! १२ प्रवासी असलेली क्रूझर कार कोसळळी कालव्यात; १० जण बेपत्ता
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Delhi Assembly Elections 2025 Seven AAP MLAs resign
‘आप’च्या सात आमदारांचे राजीनामे; पक्ष नेतृत्व विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप
zee marathi tv serial mahasangam meghan jadhav reveal efforts behind shoot
२५० क्रू मेंबर्स, ६० कलाकार अन्…; २ मालिकांच्या ‘महासंगम’साठी केली ‘अशी’ तयारी! पुण्यात ‘या’ ठिकाणी पार पडलं शूटिंग
notorious gangster gajya marne
कुख्यात गुंड गजा मारणे याच्या चित्रीकरणाचा प्रसार; चार महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
waqf board amendment bill 2024
Waqf Board Bill: वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भातल्या बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या १२ सुधारणा मंजूर, विरोधकांच्या सर्व सुधारणा फेटाळल्या!
bhandara jawahar nagar ordnance factory blast update eight dead
भंडारा स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू, प्रशासनाकडून चार जणांची नावे जाहीर
pmc to build well equipped fire brigade headquarters to be build in pimpri chinchwad
पिंपरी : अग्निशमन दलाचे सुसज्ज मुख्यालय; संग्रहालय, प्रेक्षागृहा आणि वाहनतळ

राज्यात १९९६ मध्ये नऊ जागांसाठी झालेली विधान परिषदेची निवडणूक माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चांगलीच गाजली होती. १९९५ मध्ये लातूर मतदारसंघात पराभव झाल्याने विलासरावांनी विधान परिषद निवडणुकीत नशीब अजमाविले. काँग्रेसने उमेदवारी देण्यास नकार दिल्याने विलासरावांनी ‘मातोश्री’चे द्वार ठोठावले होते. शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. तेव्हा छगन भुजबळ, शिवाजीराव देशमुख, रामदास फुटाणे (काँग्रेस), अण्णा डांगे व निशिगंधा मोगल (भाजप), शिशिर शिंदे, रवींद्र मिर्लेकर व प्रकाश देवळे (शिवसेना) हे राजकीय पक्षांचे उमेदवार निवडून आले होते. नवव्या जागेकरिता दोन अपक्ष लालसिंह राठोड आणि विलासराव देशमुख यांच्यात लढत झाली होती. विलासरावांना पहिल्या पसंतीची १९ तर राठोड यांना २० मते मिळाली होती. पुढील पसंतीक्रमानुसार राठोड यांना २४६८ तर विलासरावांना २४०९ मते मिळाली. शेवटी सर्व मते मोजून झाल्याने विलासराव हे ०.५९ मतांनी पराभूत झाले. ‘तेव्हा अर्ध्या मताने पराभूत झाल्याचे दु:ख झाले होते. पण तेव्हा पराभूत झालो नसतो तर १९९९ मध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नसती, अशी भावना तेव्हा विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे विलासरावांना पराभूत करणारे राठोड हे त्यांचे मित्र होते.  विलासराव तेव्हा शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आले असते तर १९९९ मध्ये काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली नसती.

सर्वाधिक ११ वेळा विधानसभेवर निवडून आलेले गणपतराव देशमुख हे १९९५च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. शेकापने त्यांना १९९६ मध्ये विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. पण पुरोगामी लोकशाही आघाडीची मते फुटल्याने गणपतरावांचा त्या निवडणुकीत पराभव झाला होता.  २०१० च्या निवडणुकीत पहिल्या पसंतीची सर्वात कमी मते मिळालेले काँग्रेसचे विजय सावंत हे विजयी झाले होते. भाजपच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांना २४, शिवसेनेचे अनिल परब (विद्यमान परिवहनमंत्री) २१ तर काँग्रेसचे विजय सावंत यांना १३ मते मिळाली होती. २६१९ मतांचा कोटा होता. विजय सावंत यांना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते मिळाल्याने ते कोटा पूर्ण करू शकले. शेवटी शोभाताई फडणवीस यांना २४१५ तर परब यांना २२९१ मते मिळाली. म्हणजेच सावंत यांच्यापेक्षा पहिल्या पसंतीची आठ मते अधिक मिळूनही परब पराभूत झाले होते. 

२००८ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे पुरेशी मते असतानाही पक्षाचे उमेदवार सुधाकर गणगणे हे पराभूत झाले होते. पक्षांतर्गत वादातूनच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना या पराभवातून नेतेमंडळींनी झटका दिला होता. याशिवाय अन्य काही निकालांची नोंद झाली आहे.

Story img Loader