लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ जेट्टी रोडवरील एका दिशादर्शक फलकावर काही दिवसांपूर्वी सहा फ्लेमिंगो आदळले होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. तर, दोन गंभीर जखमी झाले. त्यानंतर पुन्हा त्याच दिशादर्शकावर आदळून तीन फ्लेमिंगोचा मृत्यू झाल्याची घटना झाली. पहिल्या अपघातानंतर पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी फ्लाईंग झोनमधील फलक काढून टाकण्याची मागणी केली होती. अखेरीस आता तो फलक काढून टाकण्यात आला आहे.

Four people died in different accidents in Pune city
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
Pune Mumbai Bangalore bypass road accident news update in marathi
भरधाव मोटार बसवर आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू
private school bus in Umarkhed accident near Palshi Fata on Saturday killing ninth grade student
भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, चार जखमी; वाई बसस्थानकासमोर अपघात
Hinjewadi two girls dead marathi news
Video : हिंजवडीत सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

फ्लेमिंगोसाठी आवश्यक असलेले शेवाळ,मासे, किटक आदी खाद्य नवी मुंबई आणि उरण परिसरातील पाणथळी विपुल प्रमाणात असल्याने, तसेच वास्तव्यासाठी पोषक वातावरणही मिळत असल्याने हजारो किमी प्रवास करून फ्लेमिंगो येथे वास्तव्यासाठी येतात. परंतु त्यांच्या वाटेतील नेरूळ जेट्टी रस्त्यावरील दिशादर्शक फलक हा अडचणीचा ठरत होता.

आणखी वाचा-ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार

काही दिवसांपूर्वी हे पक्षी फलकावर आदळल्यानंतर पर्यावरणवाद्यांनी हे दिशादर्शक फलक तातडीने हटवावा, अशी मागणी केली होती.तसेच येथे होऊ घातलेला जलवाहतूक प्रकल्प अयशस्वी ठरल्याने जेट्टी वापरात आलेली नाही.त्यामुळे सिडको पाम बीच रोडवर एक कमान उभारून त्यावर दिशादर्शक चिन्ह लावावे, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांनी सांगितले. दरम्यान, पहिल्या अपघातानंतर काही दिवसानेच याच दिशादर्शक फलकाला आदळून आणखी तीन फ्लेमिंगोचा मृत्यू झाला. पाठोपाठ झालेल्या अपघातानंतर हा दिशादर्शक फलक काढून टाकण्याचे आदेश सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर हा फलक हटविण्यात आला आहे.

ठाणे खाडी फ्लेमिंगो परिसरात भरतीची पातळी १५ सें.मीच्या पुढे गेल्यावर हजारो फ्लेमिंगो नवी मुंबईच्या पाणथळ जागेवर विश्रांतीसाठी येतात. त्यामुळे बेलपाडा, भेंडखळ,पाणजे,एनआरआय-टीएस चाणक्य आणि भांडुप उदंचन केंद्र येथील पाणथळ जागा संरक्षित कराव्या, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.

Story img Loader