मुंबई : वांद्रे पूर्व येथील भारत नगरमधील १८० बांधकामांविरोधात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने गुरुवारी सकाळी कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र या कारवाईला स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे) जोरदार विरोध केला. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) स्थानिक आमदार वरुण सरदेसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ कारवाईच्या ठिकाणी धाव घेऊन कारवाई रोखून धरली. या कारवाईविरोधात आंदोलन सुरू केले. यामुळे येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

झोपु प्राधिकरणाने भारत नगरमधील १८० बांधकामांवर नोटीसा बजावल्या होत्या. त्यानुसार झोपु प्राधिकरणाने या बांधकामावर हातोडा चालविण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी ही कारवाई करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी तेथे पोहचले. मात्र कारवाई सुरुवात होताच स्थानिक रहिवाशांनी त्यास विरोध केला. ही कारवाई बेकायदा आहे, आम्ही येथे ४० वर्षांपासून राहत आहोत, असे मुद्दे उपस्थित करीत काही स्थानिक रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला. तर वरुण सरदेसाई यांनीही या कारवाईला विरोध करीत कार्यकर्त्यांसह आंदोलन सुरू केले आहे.

MNS workers beat up bullet drivers who made noise in Nigadi pune news
MNS News: पुण्यात मनसेचा बुलेट चालकाला चोप, कर्णकर्कश्य आवाजाच्या सायलेन्सर त्रासाविरोधात धडक कारवाई
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Traffic police take action against vehicles engaged in illegal traffic in Vasai Virar city
बेकायदेशीर वाहनांवरील कारवाई जोरात, वाहनचालकांची पळापळ, नागरिकांना दिलासा
४१ इमारतींवरील कारवाईला वेग ,एकाच दिवसात ४ इमारती जमीनदोस्त
Despite complaints and protests no action taken on unauthorized slums and parking at Turbhe Sector 19F
अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी ‘तारीख पे तारीख’ तुर्भे येथील भूखंडावरील कारवाईसाठी पालिकेची चालढकल
Kalyan Viral Video
“कल्याणकरांचं आयुष्य सोपं नाहीय”, कल्याण स्टेशनवरचा ‘तो’ जीवघेणा प्रकार पाहून धक्का बसेल; VIDEO एकदा पाहाच!
Kulgaon Badlapur municipal news in marathi
वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश
Road encroachments removed in badlapur west railway station area
बदलापुरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली; पूर्वेतील कारवाईनंतर पश्चिमेतही धडक कारवाई

हेही वाचा…Aditya Thackeray : “…तर आम्हीही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करु”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर असं का म्हणाले आदित्य ठाकरे?

येथे १९७० पासून राहणारे रहिवासी पात्र असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच ही कारवाई अदानी समुहाच्या प्रकल्पासाठी केली जात असल्याचा आरोपही त्यांंनी केला. दरम्यान, बांधकाम पाडण्यास संमती दिलेल्या रहिवाशांच्या घरांवर जेसीबी चालविण्यात येत आहे. मात्र काही रहिवाशांनी बांधकाम पाडण्यास संमती दिलेली नाही. असे असतानाही या घरांवरही कारवाई करण्यात येत आहे. याविरोधात सरदेसाई यांनी आंदोलन सुरू केले आहे.

Story img Loader