मुंबईमध्ये डेंग्यूपाठोपाठ आता हिवतापाच्याही साथीचा प्रादुर्भाव वाढू लागला असून अनेक नागरिक हिवतापाने आजारी पडत आहेत. त्यामुळे सूर्यास्तानंतरही धूरफवारणी करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका संजना मुणगेकर यांनी केली आहे.
दिवसा चावणाऱ्या डासांमुळे डेंग्यू होत असून या डासांचा नायनाट करण्यासाठी दिवसभर विविध भागांमध्ये धूरफवारणी करण्यात येत आहे. रात्री चावणाऱ्या डासांमुळे हिवताप होत असल्याचे निदर्शनास आले आहे. संध्याकाळी धूरफवारणी होत नसल्याने या डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी सूर्यास्तानंतरही पालिकेमार्फत धूरफवारणी करावी, अशी मागणी मुणगेकर यांनी केली आहे. पालिका सभागृहाच्या होणाऱ्या बैठकीत ठरावाच्या सूचनेद्वारे त्या ही मागणी करणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा