मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांनी डिसेंबरअखेर २९ लाख टन साखर उत्पादन केले आहे. पंधरा नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या साखर हंगामाने आता गती घेतली आहे. साखर पट्ट्यात चांगली थंडी असल्यामुळे साखर उताराही चांगला मिळत असल्यामुळे गाळपाला वेग आला आहे. साखर आयुक्तालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदा सहकारी ९६ आणि खासगी ९४, अशा एकूण १९० कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. दैनंदिन सरासरी ९ लाख ६९ हजार ८०० टन क्षमतेने उसाचे गाळप सुरू आहे. डिसेंबरअखेर ३३८ लाख टन उसाचे गाळप झाले असून, सरासरी ८.६ टक्के साखर उताऱ्याने एकूण २९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

ऊस गाळप, साखर उत्पादन आणि उताऱ्यात कोल्हापूर साखर विभाग आघाडीवर आहे. कोल्हापूर विभागात ३९ कारखाने गाळप करीत असून, त्यांनी ७८ लाख टन उसाचे गाळप करून १०.१३ टक्के साखर उताऱ्याने सात लाख टन साखर उत्पादन केले आहे. पुणे विभागानेही सात लाख टन साखर उत्पादन केले आहे. गत वर्षी डिसेंबरअखेर सहकारी १०१ आणि खासगी १०३, अशा २०४ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. दैनंदिन ९.९४ लाख टन क्षमतेने गाळप करून ४३० लाख टन उसाचे गाळप पूर्ण करून सरासरी ८.९ टक्के साखर उताऱ्याने ३८ लाख टन साखर उत्पादन केले होते. गत वर्षाच्या तुलनेत कमी कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे ऊस गाळप, साखर उत्पादन आणि साखर उताऱ्यातही घट झाल्याचे दिसून येत आहे.

Rajarambapu Patil Cooperative Sugar Factory will provide 2 5 lakh sugarcane seedlings to farmers
राजारामबापू कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख ऊसरोपे पुरवणार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
central government raised purchase price of ethanol from C heavy molasses to Rs 57 97 per liter from Rs 56 58
इथेनॉल खरेदीच्या दरवाढीचे गाजर जाणून घ्या, केंद्र सरकारच्या निर्णयावर साखर उद्योग नाराज का
india sugar production declines by 2 million tonnes
देशांतर्गत साखर उत्पादनात २० लाख टनांची घट; घट ४० लाख टनांवर जाण्याची भीती
How much sugar has been produced in Maharashtra and how much will be produced Mumbai print news
राज्याने साखर उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा गाठला; जाणून घ्या, साखर उत्पादन किती झाले, किती होणार 
Same place for dry port and sugar company Meeting soon to resolve the dispute
शुष्क बंदर, साखर कंपनीसाठी एकच जागा; तिढा सोडविण्यासाठी लवकरच बैठक
soybean procurement target for 2024 25 has adjusted based on district responses
राज्यात सोयाबीन खरेदीमध्ये सहा जिल्ह्यांच्या उद्दिष्टांना कात्री
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?

हेही वाचा…अजित पवार यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांची मागणी

राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादन शक्य

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशनने (विस्मा) चालू गाळप हंगामात १०० ते १०२ लाख साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यापैकी १२ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळविले जाऊन निव्वळ साखर उत्पादन ९० लाख टनांवर जाण्याचा अंदाज विस्माने व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात (एफआरपी) वाढ केल्यामुळे साखर आणि इथेनॉल उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे किमान साखर विक्री दर ४१ रुपये प्रति किलो करावा. उसाचा रस, बी हेवी मोलॅसिस, सी हेवी मोलॅलिसपासून तयार केलेल्या इथेनॉल खरेदीचे दर तीन ते पाच रुपयांनी वाढवावेत, अशी आग्रही मागणी विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Story img Loader