कांदिवली येथे वास्तव्यास असलेल्या ममता चौरसिया (२६) यांनी बुधवारी राहत्या घरी गळाला फास घेऊन आत्महत्या केली. हुंड्यासाठी पती आणि सासऱ्याकडून सतत होणार्‍या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून ममताने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी केली. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच आरोपी पती अशोककुमार चौरसिया आणि सासरे अर्जुनप्रसाद चौरसिया या दोघांनाही कांदिवली पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा- विद्यार्थ्यांची काळजी घेणे, त्यांचे संरक्षण करणे शिक्षकाचे कर्तव्य; शिक्षकाला दोषी ठरवताना विशेष न्यायालयाची टिप्पणी

Sanjay Rathod case, girl suicide, High Court,
संजय राठोड प्रकरण : तपासाला आक्षेप नसल्याचा आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांचा उच्च न्यायालयात दावा
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
boyfriend killed his girlfriend in pune
पुणे : प्रेमसंबंधातून महिलेवर चाकूने वार करुन खून,प्रियकराला अटक
Son Death 10 Days After Mother Death in Beed
Mother and Son Death : आई वारल्यानंतर होता दशक्रिया विधी, त्याच दिवशी मुलाची अंतयात्रा! बीडमधली हृदयद्रावक घटना
A case has been filed against parents in the case of forced marriage of a minor girl Pune news
अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह प्रकरणी आई-वडिलांसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल; पीडिता गर्भवती झाल्यानंतर प्रकार उघड
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram to join Sharad Pawar faction
गडचिरोली : धर्मरावबाबा आत्राम कुटुंबातील बंडावर शिक्कामोर्तब; भाग्यश्री आत्राम १२ सप्टेंबरला…
Thane Suicide youth, highly educated youth thane,
ठाणे : उच्च शिक्षित तरुणाची आत्महत्या
conversion
Triple Talaq : आधी धर्मांतर, मग तीन तलाक; उत्तर प्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा असतानाही कशी झाली महिलेची फसवणूक?

ममता मूळच्या उत्तर प्रदेशातील रहिवाशी होत्या. त्यांचे आई – वडील तेथेच वास्तव्यास असून मोठा भाऊ जितेंद्र चौरसिया कांदिवली परिसरात राहतो. तक्रारीनुसार, जून २०१९ रोजी ममताचा उत्तर प्रदेशात अशोककुमारसोबत दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने विवाह झाला. अशोककुमारने केलेल्या मागणीनुसार ममताच्या कुटुंबियांनी त्यांना सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य दिले होते. दोन वर्षांपूर्वी ममता पतीसोबत मुंबईत आली होती. कांदिवलीतील गौसिया मशिदीजवळील जनता कॉलनीतील भाड्याच्या खोलीत ते दोघे राहात होते. त्या खोलीची अनामत रक्कम व भाडे तिचा भाऊ जितेंद्र देत होता.

हेही वाचा- “गिरीश बापटांनी कसब्याचा गड मजबूत केला, त्यांचा शब्द…”, देवेंद्र फडणवीस व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले…

लग्नात हुंडा दिल्यानंतरही अशोककुमार व त्याचे वडील अर्जुनकुमार यांच्याकडून ममताचा हुंड्यासाठी छळ सुरू होता. तिच्याकडे ते दोघेही सतत पैशांची मागणी करीत होते. माहेरून पैसे आणले नाही तर तिला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत होती. बहिणीला त्रास होऊ नये म्हणून जितेंद्र आणि त्याचे कुटुंबिय त्यांना नेहमीच आर्थिक मदत करीत होते. दरम्यानच्या काळात ममताला मुलगी झाली. मुलीवरून नंतर पती व सासरा तिला सतत टोमणे मारत होते. पैशांवरून सतत या दोघांमध्ये वाद सुरू होते. सततच्या वादाला, तसेच हुंड्यासाठी होणार्‍या छळाला ममता कंटाळली होती. यामुळे आलेल्या नैराश्यातून बुधवारी सकाळी ६ वाजता ममताने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.