‘मध्य रेल्वेचे विस्कळीत झालेले वेळापत्रक दहा दिवसांच्या आत सुरळीत करा’, या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सूचनेनंतर मध्य रेल्वेने जारी केलेले सावधगिरीचे आदेश शिथिल करत थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. या परिसरात ठिकठिकाणी लागू केलेल्या सावधगिरीच्या आदेशांपैकी २० टक्के आदेश मंगळवारपासून शिथिल केले आहेत. त्याचा परिणाल लगेचच जाणवून वेळापत्रकातील वक्तशीरपणा किमान २ टक्क्यांनी सुधारेल, असे अधिकारी सांगत आहेत.
मध्य रेल्वेमार्गावर होणाऱ्या सततच्या बिघाडांची दखल थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली. त्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांना रेल्वेचे वेळापत्रक तातडीने सुरळीत करण्याचे आदेश दिले. मात्र देखभाल-दुरुस्तीसाठी अपुरा वेळ, जुन्या कालबाह्य गाडय़ा, रेल्वेरूळांची अत्यंत क्लिष्ट रचना आणि निधीचा अभाव यांचा मेळ घालून वक्तशीरपणा कसा साधायचा, या पेचात मध्य रेल्वेचे अधिकारी पडले आहेत. या सर्व गोष्टी तातडीने मार्गी लागणे शक्य नसल्याने आता मध्य रेल्वेच्या परिचालन विभागाने यावर तोडगा शोधला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा