मुंबई : केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा म्हणजेच हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा. तसेच पणन मंडळाने अशा प्रकरणांत आजवर काय कारवाई केली, त्याचा अहवाल सादर करा, असे थेट आदेश प्रभारी कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी दिले आहेत.

हेही वाचा – मुंबईच्या किमान तापमानात घट

Farmers led by Kapil Patil met thane collector to proper compensation for road affected farmers
रस्तेबाधित शेतकऱ्यांना लवकर मोबदला द्या, शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
raigad collector recommended increasing compensation for farmers affected by virar alibag aorridor
शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याची शासनाला शिफारस, रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविल्याने शेतकऱ्यांचा मोर्चा रद्द
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
hingoli bogus applications for crop insurance
हिंगोलीतही १८१४ बोगस पीक विमा अर्ज आले समोर; बेचीराख, शासकीय जमिनीवरही काढला विमा
is state currently stopped issuance of birth certificates to track down illegal Bangladeshi citizens
अवैध बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू? ‘या’ आदेशाने चर्चेस बळ
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
congress leader vijay wadettiwar reacts on criminal in santosh deshmukh murder case
“संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे नालायक…”, वडेट्टीवार यांची टीका

हेही वाचा – प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत ३५ लाख लाभार्थी!

आयुक्त भागडे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत कृषी विभागातील संचालक, पणन संचालनालय, वखार महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी भागडे म्हणाले, केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी होणार नाही, याची खबरदारी कृषी पणन संचलनालयाने घेतली पाहिजे. व्यापारी शेतीमाल कमी दर्जाचा असल्याचे दाखवून जाणीवपूर्वक हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमालाची खरेदी करतात. अशा प्रकारे कमी दराने शेतीमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर पणन मंडळाने आजवर काय कारवाई केली, याचा सविस्तर तपशील सादर करावा. शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे. हमीभाव आणि प्रत्यक्ष बाजारभाव यांचे संनियंत्रण करण्यासाठीची यंत्रणा जिल्हा व तालुका पातळीवर सक्रिय असली पाहिजे. शेतीमाल खरेदी विक्रीसाठी ई-नाम प्रणालीचा प्रभावी वापर झाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असेही भागडे म्हणाले.

Story img Loader