मुंबई: मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. त्यामुळे या लढय़ाचा इतिहास शाळेत शिकविण्याची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसेच औरंगाबादकरांच्या उरावर बसलेल्या ‘रझा’कार आणि ‘सजा’कारांचा मनसे लवकरच बंदोबस्त करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा <<< दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्धार

हेही वाचा <<< वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान शिंदे गटाला; दसरा मेळाव्यासाठी बंडखोरांचा अर्ज स्वीकारला, शिवसेनेचा फेटाळला

आजचा दिवस एखाद्या उत्सवासारखा साजरा व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करीत ठाकरे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस, शिवसेना आणि एआयएमआयएम या पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take the marathwada mukti sangram course raj thackeray ysh