मुंबई : टाटा पॉवरच्या विद्युत उपकेंद्रातील रोहित्रामध्ये सोमवारी रात्री बिघाड झाल्यामुळे भांडूप जलशुद्धीकरण केंद्रातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मंगळवारी दिवसभर पश्चिम उपनगरे आणि शहरामधील काही भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. दहिसर, कांदिवली भागात विलंबाने पाणीपुरवठा झाला. दरम्यान, या भागातील पाणीपुरवठा बुधवारी पूर्ववत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव ५० टक्के भरलेले असले तरी सोमवारी रात्रीपासून पश्चिम उपनगरांमधील अनेक भागांतील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.

मंगळवारी काही भागात नियमित वेळेपेक्षा उशीरा पाणीपुरवठा झाला. टाटा पॉवरच्या कामशेत आणि साळशेत येथील विद्युत उपकेद्रातील रोहित्रांमध्ये सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास अचानक बिघड झाला. त्याचा फटका मुंबई महानगरपालिकेच्या भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला बसला. जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युतपुरवठा तासाभरात सुरळीत झाला. मात्र त्याचा परिणाम जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणेवर झाला.

transformer Failure Mahapareshan,
महापारेषणच्या ५० एमव्हीए रोहित्रात बिघाड, वसई विरारमधील वीज पुरवठ्यावर परिणाम
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
IIT mumbai
तेल शुद्धीकरण कारखान्यांतून सोडलेल्या पाण्यामध्येच प्रदूषक नष्ट करणारे जीवाणू; आयआयटी मुंबईतील संशोधकांचे संशोधन
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
navi Mumbai potholes kopar khairane marathi news
नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरातही खड्डे, डासांचा प्रादुर्भाव; नागरिक, कर्मचाऱ्यांना पाठदुखीचा त्रास
centre approves salt pan lands for rehabilitation of ineligible under dharavi redevelopment project
अपात्र ‘धारावी’करांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; मिठागराची २५६ एकर जागा हस्तांतरित करण्यास केंद्राची परवानगी
Implementation of the ban on POP idols in Mumbai in a phased
मुंबईत पीओपी मूर्तीवरील बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने
artificial intelligence in medical field
कुतूहल: वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता

वैतरणा जलवाहिनीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्याला त्याचा फटका बसला. त्यामुळे दहिसर पश्चिम भागात सोमवारी रात्री पाणीपुरवठा होऊ शकला नाही. मात्र या भागातील पाणीपुरवठा हळूहळू पूर्ववत करण्याचे प्रयत्न जल अभियंता विभागाकडून मंगळवारी सुरू होते. या भागात मंगळवारी विलंबाने पाणीपुरवठा झाला. तसेच केवळ ५ ते १० टक्के कमी पुरवठा होऊ शकला. ही यंत्रणा पूर्ववत होण्यास आणखी काही कालावधी लागणार असून बुधवारी पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.