मुंबई: सीएसएमटी – जालना वंदे भारत एक्सप्रेसला बैलाने धडक दिल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी याच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आसनगाव येथे जालना-सीएसएमटी वंदे भारतमध्ये ब्रेक बायडिंग झाले. त्यामुळे बराच वेळ आसनगाव येथे वंदे भारत थांबली होती.

सीएसएमटी-जालना मार्गावर १ जानेवारीपासून नवीकोरी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. ‘ऑटोमॅटिक ब्रेकींग’ यंत्रणेमुळे वंदे भारत एक्सप्रेस विनाइंजिन घाटातून प्रवास करू शकते. मात्र मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास ब्रेक बायडिंग झाल्याने आठगाव – आसनगावदरम्यान वंदे भारत रखडली. त्यामुळे लोकल सेवा कोलमडली.

jawans killed seven Naxalites during encounter in Chhattisgarhs Dantewada
गडचिरोली : दक्षिण अबूझमाडमध्ये सात नक्षल्यांचा खात्मा, घटनास्थळी…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
zoom phone launched in india service to begin in pune
झूम फोन सेवेला पुण्यातून सुरुवात
Outbreak of dengue mumbai, Malaria mumbai,
मुंबईत हिवताप, डेंग्यूचा प्रादुर्भाव
Murder of young man in Karvenagar who became an obstacle in an immoral relationship
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा कर्वेनगरमध्ये खून
online gambling, youth suicide Virar,
ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी, गुजरातमधील तरुणाची विरारमध्ये आत्महत्या
Nagpur video | a Foreigner Befriends Elephant
फॉरेनरने केली नागपुरच्या हत्तीबरोबर मैत्री; गणेशोत्सवातील VIDEO होतोय व्हायरल
Shakuntala Bhagat, First woman civil engineer,
शकुंतला भगत… भारतात ६९ पूल बांधणाऱ्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनिअर

हेही वाचा… तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे खोळंबली; कार्यालयात पोहोचण्यास कर्मचाऱ्यांना विलंब

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर ३० ते ४० मिनिटांनी वंदे भारत मार्गस्थ झाली. वेगवान प्रवास अशी वंदे भारतची ओळख असली तरीही तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. जादा पैसे मोजूनही वेळेत प्रवास न झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

मंगळवारी सकाळी १०.१८ च्या कसारा – सीएसएमटी जलद लोकलच्या पुढे नेहमीप्रमाणे जालना – सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस मार्गस्थ झाली. तर, आठगाव – आसनगावदरम्यान वंदे भारतमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली, असे एका प्रवाशाने सांगितले.

मुंबईहून १३ जानेवारी रोजी जालन्याला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला एका बैलाला धडक दिल्याची गंभीर घटना घडली. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसचा दर्शनी भाग चेपला. तसेच काही भाग तुटला. या अपघातामुळे वंदे भारत एक्सप्रेसचा पाऊणतास खोळंबा झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.