मुंबई : गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात सुमारे २ अंशाने घट झाली असून त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी सौम्य गारवा आणि दुपारच्या वेळी उबदार वातावरणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. मात्र सध्याचे सरासरी कमाल तापमान २ अंशाने कमी आणि किमान तापमान २ अंशाने अधिक असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. तर, येत्या दोन दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होणार असून किमान तापमान २० अंशापुढे आणि कमाल तापमान ३० अंशापुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईसह राज्यात सध्या संमिश्र वातावरण तयार झाले आहे. ढगाळ वातावरण, सौम्य गारवा आणि उष्णता जाणवत आहे. यात हवा प्रदुषणही वाढत आहे. परिणामी, नागरिकांना प्रदुषणाचा सामना करावा लागत आहे. सध्या राज्यातील बहुतांश भागातील तापमानात किंचित घट झाली आहे. मात्र, काही दिवसांत पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Mumbai Over 70 percent of 23 8 km Vadape thane highway concreting on mumbai nashik highway is complete
वडपे – ठाणेदरम्यानच्या आठ पदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण
bmc decided to start 25 more Aapla Dawakhanas and three physiotherapy centers in 2025
मुंबई महानगरपालिका वर्षभरात २५ ‘आपला दवाखाना’ सुरू करणार
Samajwadi Party opposed BMC budget property tax
व्यावसायिक झोपड्यावर मालमत्ता कर आकारण्यास समाजवादी पक्षाचा विरोध, घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्कालाही विरोध
Sewri-Worli elevated road work will be speed up
शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम घेणार वेग
bombay hc ordered to form special investigation team to investigate financial fraud
७,३०० कोटी रुपयांचे फसवणूक प्रकरण; एसआयटी चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश
congress state president nana patole calls mahayuti government corrupt
महायुतीचे सरकार भ्रष्ट, तीन पक्षांत मलई खाण्याची स्पर्धा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात
State board takes one step towards making 10th and 12th exams copy free
दहावी, बारावीच्या परीक्षेवर ड्रोनची नजर; कॉपीमुक्त अभियानाच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश
election commission status to cooperative election authority
सहकार निवडणूक प्राधिकरणाला आयोगाचा दर्जा
Loksatta Varshavedh special issue issue released by chief minister devendra fadnavis
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळ्याला रंगत; ‘लोकसत्ता वर्षवेध’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

हेही वाचा >>> “राजन विचारे यांच्या सुरक्षेत कशाच्या आधारे कपात?” सुरक्षा कपातीबाबतचा अहवाल सादर करा, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

मंगळवारी सांताक्रूझ येथील किमान तापमान १९.८ अंश आणि कुलाबा येथील किमान तापमान २०.५ अंश नोंदवण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत किमान आणि कमाल तापमानात काही प्रमाणात बदल झाला आहे. पारा खाली आला असून साधारणशी थंडी पडली आहे. मात्र, हे वातावरण काहीच दिवस राहणार असून पुन्हा तापमानात वाढ होईल असा अंदाज आहे. राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.

Story img Loader