मुंबई : ठाणे-बोरिवलीदरम्यानचे अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. सध्या ठाण्याच्या दिशेने भुयारीकरणासाठी लॉन्चिंग शॉफ्टचे काम सुरू असतानाच आता हा प्रकल्प वेगाने मार्गी नेण्याच्या दृष्टीने ‘एमएमआरडीए’ने महत्त्वाचा टप्पा पार केला. बोगद्याच्या भुयारीकरणासाठीच्या चार टनेल बोअरिंग यंत्रांपैकी (टीबीएम) पहिले टीबीएम यंत्र तयार झाले आहे. त्याची चाचणीही यशस्वी झाली. हे पहिले स्वदेशी टीबीएम एप्रिलमध्ये चेन्नईतील ‘हेरेनकनेट’ कंपनीतून ठाण्यातील लॉन्चिंग शाफ्ट स्थळी आणण्यात येईल. सप्टेंबरमध्ये हे टीबीएम भुगर्भात सोडले जाईल आणि ऑक्टोबरच्या आरंभी भुयारीकरणाच्या कामास सुरुवात होईल. एप्रिलमध्ये ठाण्यात दाखल होणाऱ्या या टीबीएमला ‘नायक’ असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, भुयारीकरणासाठी चार टीबीएमची गरज असून उर्वरित तीन टीबीएमही लवकरच ठाणे, बोरिवलीत दाखल होतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा