मोठे नाले, उपनाले, पर्जन्य जलवाहिन्या यांमधून वाहणारे सांडपाणी रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. समुद्र दुषित होण्यास कारणीभूत ठरणारे हे प्रवाह बंद करणे, अन्यत्र हलवणे या कामांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता सल्लागार नेमण्यात येणार आहे.

हेही वाचा- मुंबई: म्हाडाच्या घरांसाठी एकच नोंदणी सेवा गुरुवारपासून; कोणत्याही सोडतीसाठी अर्ज करण्याची सुविधा

All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!
Bandra Worli sea bridge coastal raod will be inaugurated by CM Fadnavis on Republic Day
सागरी किनारा मार्ग पूर्णक्षमतेने सुरू होणार, सागरी किनारा आणि वरळी वांद्रे सागरी सेतू जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी लोकार्पण
Navi Mumbai Municipal Corporation has no choice but to devise new sources for water supply in next five years
वाढीव पाण्यासाठी प्रयत्नांची शर्थ; भीरा धरण, बारवीच्या पाण्यासाठी बैठकांचे सूतोवाच

मुंबई शहर आणि उपनगरात मिळून एकूण २९ मोठे नाले आहेत. हे नाले व उपनाले खाड्या आणि समुद्रात विलीन होतात. तसेच पर्जन्य जलवाहिन्यांमधील पाणीही समुद्राला जाऊन मिळते. पावसाळा संपल्यानंतरही हे नाले, पर्जन्य जलवाहिन्या यामधून सांडपाणी समुद्राला जाऊन मिळते. प्रक्रिया न केलेल्या या सांडपाण्यामुळे समुद्र दूषित होत असतो. मुंबईतील नद्या, तलाव किंवा खाडी यामध्ये बिनपावसाळी प्रवाह, प्रक्रिया न केलेले सांडपाणी, अर्धवट प्रक्रिया केलेले मलप्रवाह समुद्राला जाऊन मिळत असल्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूुषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला यापूर्वीच सांगितले आहे. तसेच यापूर्वी महानगरपालिकेला त्याकरिता दंडही केला होता. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आता समुद्र दुषित होण्यास कारणीभूत ठरणारे हे प्रवाह बंद करणे, अन्यत्र हलवणे या कामांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता सल्लागार नेमण्यात येणार आहे. या कामांसाठी महानगरपालिकेने निविदा मागवल्या होत्या. निविदा प्रक्रियेअंती सल्लागाराची निवड करण्यात आली असून या कामासाठी महानगरपालिका सल्लागाराला पावणे दोन कोटी रुपये देणार आहे.

Story img Loader