मुंबई : मुंबईतील सगळ्या रस्त्यांचे सध्या काँक्रिटीकरण सुरू आहे. याशिवाय, काही विकासकामेही सुरू आहेत. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे सर्रास तोडली जात असून ती पुन्हा लावली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने बुधवारी दखल घेतली. तसेच, विकासकामांसाठी तोडली जाणारी झाडे पुन्हा लावण्याबाबत धोरण आहे का, अशी विचारणा करून ते सादर करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले.

पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी जनहित याचिकेद्वारे उपरोक्त मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच, महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) संरक्षण आणि वृक्ष संरक्षण कायद्यानुसार, विकासकामे किंवा पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प राबवल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा नव्याने झाडे लावण्याची अट घालण्याची मागणी केली आहे. ही अट पूर्ण न केल्यास या कामांना मज्जाव केला जावा, अशी मागणीही बाथेने यांनी मागणी केली आहे.

High Court angry over fatal local travel Mumbai
लोकांना गुरांप्रमाणे प्रवास करायला लावणे लाजिरवाणे; जीवघेण्या लोकल प्रवासावरून उच्च न्यायालयाचा संताप
Mumbai Municipal Corporation invited applications from Executive Engineers for the post of Assistant Commissioner Mumbai
मुंबई महानगरपालिकेला सहाय्यक आयुक्त मिळेना; कार्यकारी अभियंत्यांकडून अर्ज मागवले
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
71 87 percent voter turnout recorded in maharashtra legislative council elections
विधान परिषदेसाठी ७१.८७ टक्के मतदान; भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची कसोटी
Chopra bus station in Jalgaon is the cleanest in the state mumbai
जळगावमधील चोपडा बस स्थानक राज्यात सर्वात स्वच्छ; ५० लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर
opposition boycotts cm tea party on on maharashtra monsoon session eve
सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी; विरोधकांचा सरकारवर हल्ला, चहापानावर बहिष्कार
CM Eknath Shinde To Uddhav Thackeray
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : “पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी”, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर

हेही वाचा >>>अकरावी प्रवेश प्रक्रिया: पहिली प्रवेश यादी आज जाहीर होणार

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी, महापालिकेतर्फे सध्या मुंबईतील सगळ्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम केले जात आहे. याशिवाय, काही ठिकाणी रस्त्यांच्या रूंदीकरणाचेही काम सुरू आहे. या कामांसाठी रस्त्यााच्या दुतर्फा असलेली झाडे बेमालूमपणे तोडली गेली असून ती पुन्हा लावली गेलेली नाहीत किंवा ती लावण्याकरिता पुरेशी जागाही सोडण्यात आलेली नाही, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. अस्तित्त्वात असलेल्या वृक्षाच्छादनाचे संरक्षण करण्यातही महापालिका अपयशी ठरल्याकडेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

हेही वाचा >>>एसटीला वरदान ठरलेल्या मालवाहतूक गाड्यांची संख्या घटली; मालवाहतूक गाड्यांची आयुर्मान पूर्ण झाल्याने मालगाड्या भंगारात

न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्याची दखल घेतली. तसेच, विकासकामांसाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडल्यानंतर ती पुन्हा लावण्याबाबत काही धोरण आहे का, अशई विचारणा महापालिकेच्या वकिलांकडे केली. असे धोरण असल्यास ते पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले.

विकासकामांबाबतच्या धोरणात हा मुद्दा दुर्लक्षित

महापालिकेने १ मार्च रोजी मुंबईतील विकासकामांबाबतचे धोरण जाहीर केले. मात्र, या धोरणात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या आच्छादनाच्या मुद्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा दावाही याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. विकासकामे करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे कोणताही विचार न करता तोडली जात असल्याबाबत महापालिका आणि महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला पत्रव्यवहार केला होता. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात न आल्याने याचिका केल्याचे बाथेना यांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले.