मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी एक तानसा धरण बुधवारी दुपारी ४.१६ च्या सुमारास ओसंडून वाहू लागले. तसेच, २० जुलै रोजी नुकतेच तुळशी धरणही पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले होते. मागील काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीपातळी झपाट्याने वाढू लागली आहे.

यंदा जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने, तसेच धरणांनी तळ गाठल्यामुळे उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरावा, यासाठी महानगरपालिकेने १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र, आता तुळशी पाठोपाठ तानसा धरणही ओसंडून वाहू लागल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सातही धरणांमध्ये ५८.५८ टक्के इतका जलसाठा आहे.

Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
Action plan for water transport in Mumbai news
मुंबईतील जलवाहतुकीसाठी कृती आराखडा
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!
Navi Mumbai Municipal Corporation has no choice but to devise new sources for water supply in next five years
वाढीव पाण्यासाठी प्रयत्नांची शर्थ; भीरा धरण, बारवीच्या पाण्यासाठी बैठकांचे सूतोवाच
Birds were counted at Tansa and Modaksagar Lakes by International Wetland and Forest Department
तानसा अभयारण्यात पक्षी गणना, ७५ पक्ष्यांची नोंद

हेही वाचा >>>आरोग्यावर अडीच टक्के तरतुदीची पंतप्रधान मोदींची २०१७ ची घोषणा हवेतच! आरोग्यावरील तरतूद निराशाजनक…

तानसा धरणाची कमाल जलधारण क्षमता १४,५०८ कोटी लीटर (१४५,०८० दशलक्ष लीटर) एवढी आहे. गेल्या वर्षी धरण २६ जुलै रोजी पहाटे ४.३५ वाजता, तर २०२२ मध्ये १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता आणि २०२१ मध्ये २२ जुलै रोजी पहाटे ५.४८ वाजता ओसंडून वाहू लागले होते. त्यापूर्वी, २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता हे धरण पूर्ण भरुन वाहू लागले होते, अशी माहिती महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली.

Story img Loader