मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी एक तानसा धरण बुधवारी दुपारी ४.१६ च्या सुमारास ओसंडून वाहू लागले. तसेच, २० जुलै रोजी नुकतेच तुळशी धरणही पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले होते. मागील काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीपातळी झपाट्याने वाढू लागली आहे.

यंदा जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने, तसेच धरणांनी तळ गाठल्यामुळे उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरावा, यासाठी महानगरपालिकेने १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र, आता तुळशी पाठोपाठ तानसा धरणही ओसंडून वाहू लागल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सातही धरणांमध्ये ५८.५८ टक्के इतका जलसाठा आहे.

Mumbai to Kudal, tough journey,
मुंबई ते कुडाळ २० तासांचा खडतर प्रवास
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
fishermen demand government to approve diesel quota soon
हजारो मच्छीमारांना नव्या हंगामात डिझेल कोट्याची प्रतीक्षा; अनुदानास मंजुरी नसल्याने मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड
Water storage Mumbai, Mumbai dams,
मुंबई : पाणीसाठा ९७ टक्के, पावसामुळे यंदा धरणे काठोकाठ
Mumbai, Atal Setu, vehicles passed through Atal Setu,
मुंबई : अटल सेतूवरून ५० लाख वाहने धावली, सात महिन्यांत गाठला ५० लाखांचा टप्पा
Andheri to Dadar and Bhandup affected as Tansa water channel burst
तानसा जलवाहिनी फुटली; अंधेरी ते दादर आणि भांडुपला फटका
Repair of potholes, Uran-Panvel road,
उरण-पनवेल मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताने नागरिकांना दिलासा
Roads in Nashik under water due to heavy rain
अर्ध्या तासाच्या पावसात नाशिकमधील रस्ते पाण्याखाली; गटारीचे पाणी गोदापात्रात

हेही वाचा >>>आरोग्यावर अडीच टक्के तरतुदीची पंतप्रधान मोदींची २०१७ ची घोषणा हवेतच! आरोग्यावरील तरतूद निराशाजनक…

तानसा धरणाची कमाल जलधारण क्षमता १४,५०८ कोटी लीटर (१४५,०८० दशलक्ष लीटर) एवढी आहे. गेल्या वर्षी धरण २६ जुलै रोजी पहाटे ४.३५ वाजता, तर २०२२ मध्ये १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता आणि २०२१ मध्ये २२ जुलै रोजी पहाटे ५.४८ वाजता ओसंडून वाहू लागले होते. त्यापूर्वी, २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता हे धरण पूर्ण भरुन वाहू लागले होते, अशी माहिती महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली.