मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कोल्हापूर येथून वाघाटीची तीन पिल्ले आणण्यात आली आहेत. त्यामुळे उद्यानातील वाघाटींची एकूण संख्या आता ११ झाली आहे.काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील एका गावात ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांना शेतात वाघाटीची तीन पिल्ले आढळली होती. प्रथमदर्शनी ती मांजरीची पिल्ले असल्याचे समजून ऊसतोड कामगारांनी त्या पिल्लांना घरी नेले. ही बाब वनविभागाच्या लक्षात येताच वनविभागाने वाघाटीची पिल्ले ताब्यात घेऊन ती जेथे सापडली होती तेथे ठेवली. पिल्लांची व आईची भेट होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांची आई तेथे न आल्याने अखेरीस ती पिल्ले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे सुपूर्द करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा