लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करत कल्याण, डोंबिवली, ठाणे प्रवास वेगवान करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे-पडघा उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता या उन्नत रस्त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असून यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सल्लागाराच्या नियुक्तीसाठी एमएमआरडीएने नुकत्याच निविदा मागविल्या आहेत.

Undisciplined drivers fined Rs 18 lakh 90 thousand Traffic Department takes action
बेशिस्त वाहनचालकांना १८ लाख ९० हजार रुपयांचा दंड; वाहतूक विभागाची कारवाई
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Hinjewadi traffic jam
‘आयटी’तील पुणेकरांची आणखी वर्षभर कोंडी, उन्नत मार्ग रखडल्याने हिंजवडीकरांना दिलासा नाहीच
daily passengers traffic jam Shilphata route five day road work
शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया
Shilpata road remain closed five days February reconstruction work Nilaje railway flyover
अत्यंत वर्दळीचा शिळफाटा रस्ता फेब्रुवारीत पाच दिवस बंद रहाणार, वाचा सविस्तर…
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
rto measures for safe travel on the Mumbai-Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी उपायांची जंत्री
mmrda invited tenders for direct access route from Badlapur to Mumbai reducing congestion
बदलापूरहून थेट मुंबई, नवी मुंबई काही मिनिटात, एक्सेस कंट्रोल महामार्गाच्या प्रकल्प आराखड्यासाठी निविदा मागवल्या

ठाणे-नाशिक महामार्ग हा महत्त्वाचा आणि रहदारीचा मागमार्ग आहे. अशात भिवंडी, शहापूर शहरात उभ्या राहिलेल्या गोदामांमुळे ठाणे-नाशिक महामार्गावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते. अवजड वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे ठाणे-नाशिक प्रवास करणाऱ्यांना, भिवंडी, कल्याण, डोंबिवली प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. प्रवासासाठी बराच वेळ खर्ची करावा लागत आहे. पण आता लवकरच वाहनचालक-प्रवाशांची या वाहतूक कोंडीतुन, त्रासातुन सुटका होणार आहे. कारण या महामार्गाला समांतर असा ठाणे ते पडघा उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. ३० किमीच्या हा उन्नत रस्ता असणार असून यामुळे ठाणे ते नाशिक प्रवास, कल्याण, डोंबिवली, ठाणे प्रवास सुकर होणार आहे.

आणखी वाचा-एसटीची जागा भाडेतत्त्वावर देणार, ३० ऐवजी ६० ते ९० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव

राज्य सरकारच्या निर्देशानुसार एमएमआरडीएने या उन्नत रस्त्याचा सर्वंकष अभ्यास केला आहे. तर आता या उन्नत रस्त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. हा आराखडा तयार करण्याकरिता आणि यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याकरिता एमएमआरडीएने निविदा जारी केली आहे. तेव्हा सल्लागाराची नियुक्ती करत आराखडा तयार करण्यासाठी, तो मंजुर करत प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी बराच अवधी आहे. त्यामुळे या उन्नत रस्त्यावरून सुसाट प्रवास करण्यासाठी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे. मात्र त्याचवेळी महत्त्वाचे म्हणजे या सुसाट प्रवासासाठी वाहनचालकांना- प्रवाशांना पथकर मोजावा लागणार आहे. या रस्त्यावर पथकर आकारणी केली जाणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. तसेच हा उन्नत रस्ता मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे.

Story img Loader