मुंबई : मुंबईमध्ये ठिकठिकाणी एक हजार २५, तर रेल्वेच्या हद्दीत १७९ महाकाय फलक उभे आहेत. महापालिका आणि रेल्वेच्या हद्दीतील हे अनेक ठिकाणी फलकांसाठी अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची बेमालुमपणे छाटणी करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी रासायनिक प्रक्रिया करून वृक्षांचा बळी घेतला जात आहे.

मुंबईतील मुख्य रस्ते, उड्डाणपूल, इमारतींच्या आवारात महाकाय फलक उभारण्यात आले आहेत. त्यावर झळकविण्यात येणाऱ्या जाहिराती दूरवरून दृष्टीस पडाव्यात यासाठी बराच आटापीटा करण्यात येतो. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या मध्यभागी, दुभाजकांवर लावण्यात आलेली झाडे बहरतात आणि त्यामुळे जाहिरातींचे फलक झाकोळले जातात. त्याचबरोबर पदपथांवर बहरलेले वृक्षही या फलकांना अडथळा निर्माण करतात. वृक्षांच्या अडथळ्यामुळे फलकांवरील जाहिराती दूरवरून दिसत नाहीत. त्यामुळे फलक दिसण्यात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची वारंवार छाटणी करण्यात येते. पावसाळ्यात रस्त्यालगतचे, खासगी भूखंडावरील व वृक्ष बहरतात. अशा वृक्षांच्या मुळावर आता फलक उठले आहेत. काही वृक्षांच्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात येते.

CCTV, Thane district, Thane, Thane latest news,
उरणकरांच्या सुरक्षेसाठी ३४ ठिकाणी सीसीटीव्ही
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Recruitment of Engineers , Mumbai Municipal Corporation, Engineers in Mumbai Municipal Corporation,
मुंबई महापालिकेत अभियंत्यांची भरती, चार – पाच वर्ष रखडलेल्या भरतीला अखेर मुहूर्त सापडला
thane building
डोंबिवलीत कोपरमध्ये रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी करणाऱ्या बांधकामधारकांना साहाय्यक आयुक्तांची नोटीस
Auction vehicles of developer Andheri,
मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव
BJP Navi Mumbai, Navi Mumbai Eknath Shinde,
नवी मुंबईत शिंदे समर्थकांच्या अभियानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता
defaulters, water pipe connections thane,
ठाण्यात थकबाकीदारांच्या ६११ नळजोडण्या खंडीत, ३० मोटर पंप जप्त
park created through afforestation in Marol will open for citizens soon
साडेतीन एकरांत शहरी जंगल! मरोळमध्ये वनीकरणातून साकारलेले उद्यान नागरिकांसाठी लवकरच खुले

आणखी वाचा-मेट्रो ३ : आरे – दादरदरम्यान मेट्रो गाड्या धावू लागल्या, एमएमआरसीकडून चाचणीपूर्व चाचणीला सुरुवात

वृक्षांवर विषप्रयोग

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे पदपथावर वृक्षारोपण करण्यात येते. काही वर्षांतच वृक्ष मोठे होतात. डेरेदार वृक्ष लगतच्या इमारतींमधील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यांवरील रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरतात. वृक्षांच्या फांद्या खिडकी, सज्जापर्यंत पोहोचतात. तसेच दुकानदारांनाही हे वृक्ष नकोसे होतात. वृक्षांमुळे दुकानावरील पाटी, जाहिरात ग्राहकांच्या नजरेआड होते. त्यामुळे चुना अथवा अन्य रासायनिक द्रव्याचे पाणी खोडाजवळ टाकण्यात येते. काही वेळा खोडावर छिद्र करून इंजेक्शनच्या साह्याने वृक्षामध्ये रासायनिक द्रव्य सोडले जाते. यामुळे वृक्ष सुकत जातो आणि मरणपंथाला लागतो. अशा प्रकारे मुंबई अनेक ठिकाणी वृक्षांनी मान टाकली आहे.