लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. मात्र मागील अनेक महिन्यांपासून क्षयरुग्णांना औषधेच मिळालेली नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांच्या घोषणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईसह राज्यामध्ये एमडीआर क्षयरोग रुग्णांना जूनपासून औषधेच मिळालेली नाहीत. सरकारी रुग्णालयांमध्ये औषधेचे उपलब्ध नसतील, तर देश क्षयरोगमुक्त कसा होईल, असा प्रश्न उपस्थित करणारी पत्रे रुग्णांनी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांना पाठविली आहेत.

Shaktikanta Das statement that banks should give priority to women in employment
बँकांनी महिलांना रोजगारसंधीत प्राधान्य द्यावे – दास
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
farmer income double marathi news
विश्लेषण: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केव्हा होणार? शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची स्थिती काय?
Loksatta Chatura What exactly is the Drone Pilot Scheme for Women
महिलांसाठीची ड्रोन पायलट योजना नेमकी काय आहे ?
ministers given permission till august 30 for transfers within department ahead of poll
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांना ‘मोकळे रान’; बदल्यांसाठी ३० ऑगस्टपर्यंत मुभा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
GST Rate Fixation, tax phases, GST Council, rate reduction, health insurance, life insurance, Nirmala Sitharaman, Union Finance Minister,
काही वस्तूंवरील ‘जीएसटी’ दरात कपात? मंत्रिगटाकडून कर अधिकाऱ्यांच्या समितीला मूल्यमापनाचे निर्देश
Prime Minister Narendra Modi statement at the Global South Summit on food and energy security crisis and terrorism
आव्हानांचा एकत्रितरीत्या सामना करू! ग्लोबल साऊथ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

आणखी वाचा-उंचीवर मर्यादा घालण्यास सरकार अनुत्सुक; दहिहंडीच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत न्यायालयाने निर्णय देऊनही चालढकल

राज्यातील सरकारी रुग्णालयांसह विविध आरोग्य केंद्रांवर मागील तीन महिन्यांपासून क्षयरोगावरील औषधेच उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे मुंबई विभागातील जवळपास ११ हजार एमडीआर क्षयरोग रुग्णांना याचा फटका बसत आहे. आरोग्य केंद्रांवर औषधे मिळत नसल्याने रुग्णांना खासगी औषधांच्या दुकानातून औषधे खरेदी करावी लागत आहेत. एमडीआर क्षयरोग असलेल्या रुग्णांना पाच औषधे दिली जातात. त्यापैकी सायक्लोसिरिन लाईनजोलिड, क्लोफाजिमाईन या औषधांचा साठाच उपलब्ध नाही. त्यामुळे ही औषधे रुग्णांना बाहेरून विकत घ्यावी लागत असल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ही औषधे कधी मिळतील याबाबत मुंबई क्षयरोग नियंत्रण विभागाकडे विचारणा करण्यात आल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. औषधांअभावी क्षयरोग रुग्णांना होणाऱ्या या त्रासाची माहिती देण्यासाठी क्षयरुग्णांसाठी काम करणाऱ्या समाजसेवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र पाठविली आहेत. औषधे का उपलब्ध होत नाहीत, असी विचारणाही या पत्रात करण्यात आली आहे.