गेल्या काही दिवसापांसून ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू होता. या वादानंतर शनिवारी ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली.

हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले, “धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याला…”

giriraj Singh Rahul gandhi
“देशद्रोह्यांना आरएसएसची विचारधारा कधीच समजणार नाही”, राहुल गांधींच्या टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर!
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
rohit pawar on ajit pawar confession
Rohit Pawar : “ज्या पक्षाने कुटुंब फोडलं, त्यांना…”; अजित पवारांच्या ‘त्या’ कबुलीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया!
Where are the modern Indian political thinkers says Yogendra Yadav
आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत आहेत कुठे?
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
Devendra Fadnavis Trolled For His Statement
Devendra Fadnavis : “छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलं नाही, काँग्रेसने…”, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरुन ट्रोलिंग, कोण काय म्हणालं?
kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”

“हेच तुमचं हिंदुत्त्व आहे का?”

“दसऱ्या मेळाव्यात मी उल्लेख केल्याप्रमाणे आता शिवसैनिकांना दमदाटी करणे सुरू आहे. शिंदे गटात प्रवेश करा नाही तर तुमच्यावर केसेस पडतील अशा धमक्यांना देण्यात येत आहेत. ज्या शिवसैनिकांच्या जोरावर तुम्ही मोठे झालात, त्यांना धमक्या देताना काहीच वाटत नाही का? हेच तुमचं हिंदुत्त्व आहे का?” अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली.

हेही वाचा – तीन चिन्ह, तीन नावं.. उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव; म्हणाले, “लवकरात लवकर…!”

इंदिरा गांधीचाही केला उल्लेख

“आणीबाणीच्या काळा इंदिरा गांधींनी नाही केलं, ते तुम्ही करत आहात. त्यावेळी शिवसेनेवर बंदी घाला असा प्रस्ताव इंदिरा गांधीकडे आला होता. मात्र, त्यांनी शिवसेनेवर बंदी न घालण्याचा निर्णय घेतला. त्यावेळीही शिवसैनिकांना त्रास होत होता, तडीपारीही सुरू होती, अनेकांना स्थानबद्ध करण्यात येत होते. पण काँग्रेसने कधीही शिवसेना संपवायचा प्रयत्न नाही केला. आज तुम्ही जे आरोप करता की काँग्रेसबरोबर जाऊन आम्ही हिदुत्व सोडलं, तर आज ज्यांचे शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहे, त्यांच्या मांडीला मांडी लाऊन तुम्ही सत्तेस बसला आहात. तर पापी कोण काँग्रेस की भाजपा?” असा प्रश्नही त्यांनी शिंदे गटाला विचारला.