मुंबई: मुंबई, ठाण्यातील संथ मतदानप्रकरणी निवडणूक आयोगावर केलेली टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भोवण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाकरे यांच्या आरोपांची शाहनिशा करण्याचा निर्णय मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

संथ मतदानाबाबत मुंबई, ठाणे येथील जिल्हाधिकाऱ्यांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागविण्यात आला असून, त्याआधारे ठाकरे यांनी केलेल्या आरोपांची पडताळणी केली जाईल. त्यात काही तथ्य आढळले नाही तर ठाकरेंवर नियमानुसार कारवाई केली जाईल असे निवडणूक आयोगातील सुत्रांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या पाचव्या टप्यात २० मे रोजी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यांत मतदान पार पडले होते. त्यावेळी मुंबई, ठाण्यात संथ मतदानामुळे मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

PM Narendra Modi Speech
JKF’S Forgotten Crisis हे पुस्तक विरोधकांनी वाचावं, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का दिला? नेहरुंबाबत काय दावे आहेत?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
Amit Shah
Delhi Election : ‘त्यांनी फक्त दारूची दुकानं उघडली’, अमित शाहांची मनीष सिसोदियांवर सडकून टीका
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Thackeray groups protest against ST ticket price hike in thane
ठाकरे गटाचे एसटी तिकीट दरवाढी विरोधात आंदोलन
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
shivsena leader sanjay raut
पदाधिकारी म्हणतात आपण स्वबळावर लढलं पाहिजे – संजय राऊत

यावेळी तीव्र उन्हाळा असूनही मतदारांसाठी आयोगाने कोणतीही व्यवस्था केली नसल्याचा आरोप करीत अनेक ठिकाणी मतदारांनी आपला संताप व्यक्त केला होता. त्याच दिवशी दुपारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन  निवडणूक आयोगावर जोरदार आरोप केले होते.

ठाकरे यांच्या या आरोपावर नाराजी व्यक्त करीत मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. शेलार यांच्या पत्रानंतर आयोगाने ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा तपशील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयांकडून मागविला होता.

हेही वाचा >>>मुंबई: बेलासिस उड्डाणपूल सोमवारपासून बंद

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या तपशिलानंतर आयोगाने ३ जून रोजी ठाकरे यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कारवाईचे संकेत

जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आल्यावर ठाकरे यांच्या आरोपात खरोखरच तथ्य होते की त्यांनी केवळ आयोगाला बदनाम करण्यासाठी हे आरोप केले याची शहानिशा केली जाणार आहे. ठाकरे यांनी केवळ राजकीय भूमिकेतून आयोगावर हेत्वारोप केल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्याविरोधात नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती आयोगातील अधिकाऱ्याने दिली.

Story img Loader