भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज(मंगळवार) भाजपाच्या जागर मुंबईचा या कार्यक्रमात बोलताना टीका केला. उद्धव ठाकरे हे हिंदूमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या त्यांना आरोप केली.

जाहीर सभेतील भाषणात बोलताना आशिष शेलार म्हणाले, “जे औरंगजेबालाही जमलं नाही ते आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना करू पाहत आहे, माझा थेट आरोप आहे. हिंदूंमध्ये विभाजन करण्याचं काम मोहम्मद गझनीच्या बापालाही जमलं नाही. आता तुमची राक्षसी इच्छा जागृत झाली की मराठी आणि मुस्लीम दोघांनाही मी फसवीण आणि मुंबईवर माझं हिरवं कवच पसरवीण, परंतु भाजपा आणि मुंबईकर हे कदापि होऊ देणार नाही.”

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”
Uddhav Thackeray Speech News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर, “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा…”

हेही वाचा -“आमच्या मदतीवरच उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकू शकते, अन्यथा…”; आशिष शेलारांनी लगावला टोला!

याशिवाय भाजपच्या माघारीनंतर एकतर्फी झालेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. त्यांना सर्वाधिक ६६ हजार ५३० मते मिळाली. मात्र दुसऱ्या क्रमांकाची मते नोटा या पर्यायाला मिळाल्याचे दिसून आले. तब्बल १२ हजार ८०६ मतदारांनी नोटाचे बटण दाबले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यावरून विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. कारण, नोटाचा पर्याय स्वीकारावा म्हणून मतदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला होता. दरम्यान अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेहा वाचा – ‘अंधेरीत जे झाले ते बरे झाले, भाजपासाठी मुंबई महापालिका… ’; आशिष शेलारांचं विधान!

आशिष शेलार म्हणाले, ‘अंधेरीत जे झाले ते बरे झाले, भाजपासाठी मुंबई महापालिका विजयाचे चित्र स्पष्ट झाले. २०१४ नुसार विचार केला तर आघाडीच्या उमेदवारांना ९० हजार मते मिळायला हवी होती तसे घडले नाही. एक पक्ष दुसऱ्या पक्षाला मतदान करीत नाही. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबईकरांचा मतदान करायलाही विरोध आणि मतपेटीतूनही प्रचंड विरोध आणि रोष समोर आला आहे. ’

Story img Loader