मुंबई : भारतरत्न देण्याचा अधिकार पंतप्रधांनाना आहे. नरेंद्र मोदी गेली आठ वर्षे पंतप्रधान पदी आहेत. त्यांनी सावरकरांना अद्याप भारतरत्न का दिला नाही ? असा प्रश्न शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान टिकेल की नाही, अशी परिस्थिती भाजपने निर्माण केली आहे, असेही ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ठाकरे परिवार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि शिवसैनिक आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधला.स्वातंत्र्यवीर सावकार यांच्याविषयी अत्यंत आदर आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत मी सहमत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आमच्या मनात अतिव प्रेम, आदर, निष्ठा आहेच. स्वातंत्र्यसंग्रामाशी संबंध नाही, त्यांनी याविषयी बोलू नये. वंदे मातरम, भारत माता की जय म्हणण्यास नकार देणाऱ्या मेहेबुबा मुफ्ती यांच्याशी युती चालते का ? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

praskash ambedkar vidhansabha election support
विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा कुणाला? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”
Rahul Gandhi Veer Savarkar Defamation Case
Rahul Gandhi: राहुल गांधींना चार ऑक्टोबर रोजी ‘म्हणणे’ मांडावे लागणार, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक विधान
Rahul Gandhi veer Savarkar marathi news
राहुल गांधी हाजीर हो…स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान
Chief Justice Dhananjay Chandrachud asserted that the importance of independence was highlighted because of Bangladesh
बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन
Sanjay Raut on Bal Thackeray
Sanjay Raut : “तुमच्या कार्यपद्धतीमुळे भुजबळ फुटले? असं बाळासाहेबांना विचारलं अन् त्यांनी…”, संजय राऊतांनी सांगतली जुनी आठवण
ravi rana clarification on ladki bahin
Ravi Rana : विरोधकांनी टीकेची झोड उठवताच ‘त्या’ विधानावर आमदार रवी राणा यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “मी जे बोललो…”

हेही वाचा: Ranjeet Savarkar on Rahul Gandhi: ‘सावरकरांकडून देशाविरुद्ध इंग्रजांना मदत’, राहुल गांधींच्या विधानावर कुटुंब संतापलं, म्हणाले “शिवसेनेचे वारस आज त्याच…”

स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी काँग्रेस आणि आम्ही एकत्र आलो आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले. जे आरोप करत आहेत त्यांनी त्यांच्या मातृसंस्थेचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान सांगावे आणि मगच आम्हाला बोलावे. भाजपने आम्हाला देशभक्ती शिकवू नये. आरएसएसला आता शंभर वर्षे पूर्ण होतील. पण या संघाचेही स्वातंत्र्यसंग्रमात काहीच योगदान नव्हते. ते स्वातंत्र्यलढ्यापासून लांब होते. त्यामुळे त्यांनी बोलूच नये, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.