शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये युती झाली असली, तरी वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा भाग असेल का? याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. दरम्यान, याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाच – Maharashtra News Live : उद्धव ठाकरेंकडून ‘वंचित-ठाकरे गट’ युतीची घोषणा; म्हणाले, “महाराष्ट्रातील जनता…”

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Uddhav Thackeray Speech News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर, “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा…”

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज दादरमधील आंबेडकर भवन येथे पत्रकार परिषेद घेत युतीची घोषणा केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असेल का? असा प्रश्न विचारला. याबाबत बोलताना युद्धव ठाकरे म्हणाले, प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे राष्ट्रावादी काँग्रेसशी असलेले संबंध सांगितले. आमचेही तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीशी कसे संबंध होते, हे जगजाहीर आहे. परंतू ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की फसवणुकीचं राजकारण सुरू आहे. त्यावेळी आम्ही महाविकास आघाडीचा तयार करण्याचा निर्णय घेतला”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा – “नातेवाईकांचं राजकारण वाढल्याने भांडवलशाही आणि लुटारूंची सत्ता…”, शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं विधान

वंचित मविआचा भाग? उद्धव ठाकरे म्हणाले…

“आम्ही महाविकास आघाडीचा निर्णय घेतला, तेव्हा शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतील का? अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आमच्यावर विचित्र आरोप झाले. त्या सर्वांना आम्ही पुरून उरलो. साधारण अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आम्ही यशस्वीपणे चालवलं. मुळात हेतू चांगला असेल तर पुढच्या सर्व गोष्टी चांगल्या होतात. आम्हाला काल रात्री स्वप्न पडलं आणि आम्ही आज एकत्र आलो असं नाही. यापूर्वी आमच्या बैठका झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरही आमची चर्चा झाली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी बरोबर येण्यास कोणाचीही हरकत नाही”, असे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader