अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आज (२९ ऑगस्ट) थेट मंत्रालयात आंदोलन केलं. धरणग्रस्तांना सरकारने नोकरी आणि मोबदल्याचं आश्वासन दिलं होतं, जे गेल्या ४५ वर्षांमध्ये कुठल्याच सरकारने पूर्ण केलं नाही असा आरोप करत धरणग्रस्त आज थेट मंत्रालयात घुसले. धरणग्रस्तांनी आणि शेतकऱ्यांनी मंत्रालयात सुरक्षेसाठी बसवलेल्या सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केलं. यावेळी ३० पेक्षा जास्त धरणग्रस्त सुरक्षा जाळीवर उतरले होते. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलक शेतकऱ्यांची धरपकड केली. या धरणग्रस्तांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत राज्यातलं सरकार गंभीर नाही असा आरोप या धरणग्रस्तांनी केला आहे. आपल्या मागण्या मांडण्यासाठी हे धरणग्रस्त आज मंत्रालयावर धडकले, मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावर लावलेल्या सुरक्षा जाळीवर उतरले आणि त्यांनी आंदोलन केलं. अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी परिसरात सरकारने हे धरण बांधलं आहे. धरणग्रस्तांना सरकारने कोणतीही मदत दिली नाही असं सांगत धरणग्रस्त गेल्या १०५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मोर्शीच्या तहसील कार्यालयासमोर सलग १०५ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. परंतु, अद्याप सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे आज सर्व धरणग्रस्तांनी मंत्रालयात आंदोलन केलं.

Separate compartment, senior citizens,
दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा, एका मालडब्याचे ज्येष्ठांसाठीच्या डब्यात रूपांतर, रेल्वे प्रशासनाची उच्च न्यायालयाला माहिती
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Forfeiture action by Vasai virar Municipal corporation against property owners who keep arrears of property tax
मालमत्ता थकबाकीदारांना पालिकेचा दणका; पालिकेकडून मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरवात
gst council decides to form new gom for health insurance premium
विमा हप्त्यांवरील जीएसटी कपात लांबणीवर; बैठकीत व्यापक सहमती, नोव्हेंबरमध्ये निर्णय अपेक्षित अर्थमंत्री
jaydeep apate arrested from kalyan
Jaydeep Apate Arrest : मोठी बातमी! शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक; पोलिसांनी कल्याणमधून घेतलं ताब्यात
vasai lawyer association protest
वसई: वकील संघटनांचे आंदोलन स्थगित; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

“आम्हाला गेल्या ४५ वर्षांपासून या सरकारने न्याय दिला नाही”. असं म्हणत या धरणग्रस्तांनी आज मंत्रालयात प्रवेश घेतला. त्यानंतर या धरणग्रस्तांनी सुरक्षा जाळीवर उड्या मारून आगळंवेगळं आंदोलन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही आज मंत्रालयात उपस्थित आहेत. अशा वेळी धरणग्रस्तांनी मंत्रालयात आंदोलन केलं. ३० हून अधिक धरणग्रस्त मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उतरले आणि त्यांनी घोषणा दिल्या.

हे ही वाचा >> “…तरी यांची घागर उताणीच राहणार”, दहिहंडीच्या आयोजनावरून ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल

मंत्रालयात कोणीही आत्महत्येचा प्रयत्न करू नये यासाठी काही वर्षांपूर्वी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सुरक्षा जाळी बसवण्यात आली आहे. या सुरक्षा जाळीवर धरणग्रस्तांनी उड्या मारल्या.

१९७२ साली या धरणासाठी सरकारने स्थानिकांच्या जमिनी घेतल्या. धरण बांधण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहित केली. परंतु, आम्हाला त्याचा मोबदला मिळाला नाही, असं धरणग्रस्तांचं म्हणणं आहे. तसेच सरकारने आम्हाला नोकरी देऊ असं सांगितलं होतं, परंतु, आम्हाला नोकऱ्या मिळाल्या नाहीत असं एका धरणग्रस्ताने आंदोलनावेळी टीव्ही ९ मराठीला सांगितलं.