लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: संगमनेरच्या मंगेश खिलारीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ३९६ वा क्रमांक पटकावला आहे. वडिलांबरोबर चहाच्या टपरीवर काम करताना त्याने केंद्रीय लोकसेव परीक्षेची तयारीही सुरू ठेवली.

Ashwini vaishnaw pune nashik railway
जीएमआरटी आणि रेल्वेच्या तंत्रज्ञांची संयुक्त बैठक घेण्याचे रेल्वेमंत्री वैष्णव यांचे आश्वासन, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Central Civil Services information in marathi
मुलाखतीच्या मुलखात : केंद्रीय सेवा
article about mpsc exam preparation
एमपीएससी मंत्र : राज्यसेवा मुख्यपरीक्षा – इतिहास घटकाची तयारी
Day one glitches in Mantralaya facial recognition system
मंत्रालय प्रवेशाचा बट्ट्याबोळ; ‘चेहरा पडताळणी’साठी करण्यात आलेल्या अट्टहासाने कर्मचारी हैराण
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी; आयोगाला महिन्याची मुदत
non creamy layer, UPSC , OBC , OBC Candidates job,
यूपीएससी उत्तीर्ण ओबीसी उमेदवार सरकारी अनास्थेचे बळी, हे आहे कारण
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथे मंगेशचे वडील चहाची टपरी चालवतात तर आई विडी कामगार आहे. त्याचे शालेय शिक्षण सुकेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून झाले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण त्याने श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले. पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून राज्यशास्त्र या विषयातून पदवी मिळवली. पुण्यात शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयआयटी किंवा कृषी अभ्यासक्रमातील पदवी घेण्याचे त्याचे स्वप्न होते. परंतु आर्थिक अडचणींमुळे हे पर्याय निवडणे शक्य झाले नाही. मात्र काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न त्याने उरी बाळगले होते आणि त्यातूनच त्याचा युपीएससी परीक्षेचा प्रवास सुरू झाला आणि तिसऱ्या संधीत त्याला २३व्या वर्षी हे यश मिळाले.

आणखी वाचा-मुंबई: शिकवणी न लावताच युपीएससीत यश; सिंधुदुर्गचा वसंत दाभोळकर देशात ७६ वा

बारावीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून घेतले. त्यानंतर राज्यशास्त्र या विषयात पदवी शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षेचा विचार केला आणि यातूनच काहीतरी मोठं करून दाखवण्याची उमेद निर्माण झाली, असे मंगेश याने सांगितले.

Story img Loader