मुंबई : कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे रोगनिदान व उपचार यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत. विशेषतः विविध प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, त्वचा रोग, दंत चिकित्सा या क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेमुळे परिवर्तन होत आहेत. मात्र या तंत्रज्ञानाचा वापर हा जनसामान्यांचा रोगनिदान व उपचारावरील खर्च कमी करावा, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व बॉम्बे हॉस्पिटलतर्फे आयोजित ‘आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृत्रिम प्रज्ञेचा वापर वैद्यकीय क्षेत्रातील एकूणच परिदृश्य बदलवणारा ठरेल. कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीने मधुमेह व इतर जीवनशैली संबंधी समस्यांचे ओझे कसे कमी करता येईल या संबंधी संशोधन झाले पाहिजे. डॉक्टर व विशेषज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारताना रुग्णांसोबत सुसंवाद व सहानुभूती कमी होऊ देऊ नये.तसेच गरीब रुग्णांच्या सेवेबाबत विशेष तत्पर राहावे, असे राज्यपाल म्हणाले.

Use artificial intelligence with caution RBI governor advises banks print eco news
कृत्रिम प्रज्ञेचा वापर काळजीपूर्वकच, रिझर्व्ह बँक गव्हर्नरांचा बँकांना सल्ला 
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
wastage of food grains
विश्लेषण: शेतमालाची नासाडी केव्हा थांबणार?
about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation
MPSC मंत्र : कृषी घटकाचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व
loksatta kutuhal artificial intelligence technology recognizing human handwriting
कुतूहल : हस्ताक्षर ओळखणारे तंत्रज्ञान
accuracy of facial recognition technology
कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवताना सावधान!
The use of artificial intelligence AI technology is also starting in the construction sector Pune print news
‘एआय’ची अशीही कमाल! केवळ आवाजावरून बिल्डरला कळेल संभाव्य घर खरेदी करणारा ग्राहक
Loksatta kutuhal Advantages and disadvantages of large language formats
कुतूहल: विशाल भाषा प्रारूपांचे फायदे आणि तोटे

हेही वाचा…‘जेल का जवाब वोट से’, महाविकास आघाडीच्या रॅलीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही हजेरी

राज्यपालांच्या हस्ते नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे माजी फेलो दिवंगत डॉ. बी. के. गोयल व डॉ. एल. एच. हिरानंदानी यांना मरणोपरांत सन्मानित करण्यात आले. अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. केवल तलवार, डॉ. पी. व्ही. देसाई, डॉ. बी. एस. सिंघल, डॉ. सरोज गोपाल, डॉ. अशोक गुप्ता, डॉ. देवेन तनेजा, डॉ. नादीर भरुचा, डॉ. सुनील पंड्या, डॉ. सतीश खाडिलकर, डॉ. अरुण जामकर, डॉ. अनिल शर्मा आदींना देखील सन्मानित करण्यात आले.