मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांना सर्वप्रथम पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. माजी मंत्री नसिम खांनी यांच्या भेटीनंतर गायकवाड यांनी सोमवारी उत्तर मध्य मुंबईच्या माजी खासदार व काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांची भेट घेऊन, त्यांच्याशी निवडणुकीबाबत चर्चा केली.

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसिम खान यांनी स्टार प्रचारकाचा राजीनामा देऊन, आपल्याला उमेदवारी नाकारल्याबद्दल नापसंती व्यक्त केली. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून खान यांचेही नाव चर्चेत होते. परंतु ऐनवेळी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखविली.

is state currently stopped issuance of birth certificates to track down illegal Bangladeshi citizens
अवैध बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू? ‘या’ आदेशाने चर्चेस बळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Narendra Modi on foreign meddling
Narendra Modi : “गेल्या १० वर्षांतील हे पहिलेच अधिवेशन, ज्यात…”; विदेशी हस्तक्षेपावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला!
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान

हेही वाचा >>>मुंबई : गोवंडीत मिहीर कोटेचा यांच्या प्रचार फेरीवर दगडफेक

वर्षा गायकवाड यांना भाजपच्या विरोधातील लढाई लढण्याआधी पक्षांतर्गत नाराजी दूर करावी लागत आहे. शनिवारी त्यांनी खान यांची भेट घेऊन, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर राज्यात एकाही मतदारसंघात अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली नाही, त्याबद्दल आपण नाराज आहेत, गायकवाड यांना उमेदवारी दिल्याबद्दल नाही, असा त्यांनी नंतर खुलासा केला.

या मतदारसंघाचे २००४ व २००९ असे दोन वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रिया दत्त या अनेक दिवसांपासून नाराज आहेत. या वेळी तर त्यांच्या नावाचा विचारही केला नाही. या मतदारसंघात सुनील दत्त यांच्या माध्यमातून काँग्रेसने कायम वर्चस्व राखले आहे.

Story img Loader