लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी विहार धरण गुरुवारी मध्यरात्री ३.५० वाजेच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागले. आतापर्यंत सातपैकी तुळशी, तानसा आणि आता विहार धरण ओसंडून वाहू लागले आहे. सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून आजघडीला पाणीसाठा ६६.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Water storage Mumbai, Mumbai dams,
मुंबई : पाणीसाठा ९७ टक्के, पावसामुळे यंदा धरणे काठोकाठ
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Ratnagiri,Fishing Boat Sinks in Purnagad Sea, Purnagad sea, fishing boat, Coast Guard, rescue, strong winds, rough sea,
रत्नागिरी : पूर्णगड समुद्रात मासेमारी करणारी नौका खराब वातावरणामुळे बुडाली, दोघा खलाश्यांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश
Mumbai, Atal Setu, vehicles passed through Atal Setu,
मुंबई : अटल सेतूवरून ५० लाख वाहने धावली, सात महिन्यांत गाठला ५० लाखांचा टप्पा
Khadakwasla Dam, Releasing water Khadakwasla Dam,
पुणे : खडकवासला धरणातून पुन्हा पाणी सोडण्यास सुरुवात
Andheri to Dadar and Bhandup affected as Tansa water channel burst
तानसा जलवाहिनी फुटली; अंधेरी ते दादर आणि भांडुपला फटका
Repair of potholes, Uran-Panvel road,
उरण-पनवेल मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताने नागरिकांना दिलासा
Two youths died after drowning in Chulband reservoir gondiya
Gondia crime update : चुलबंद जलाशयात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा गुरुवारी पहाटे ६६. ७७ टक्क्यांवर पोहोचला. मुंबईच्या हद्दीत असलेला विहार तलाव गुरुवारी मध्यरात्री ३.५० च्या सुमारास भरून वाहून लागला. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) एवढी आहे.

आणखी वाचा-मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, वाऱ्यांचा वेगही वाढणार

जुलै महिन्यात कोसळणाऱ्या पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठ्यांत चांगलीच वाढ झाली आहे. मुंबईकरांना पुढील २४१ दिवस म्हणजेच मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध झाला आहे. मोडक सागर धरणही ९८ टक्के भरले आहे. धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत असून डोंगरातून झिरपणाऱ्या पाण्यामुळे धरणांमध्ये पाण्याची भर पडत आहे.

सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. त्यातुलनेत सध्या सात धरणांत ९ लाख ६६ हजार ३९५ दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. सात धरणांपैकी तुळशी, तानसा आणि विहार कठोकाठ भरले आहेत. तर सर्वात मोठे भातसा धरण ६४ टक्के भरले आहे.

आणखी वाचा-Worli Murder : आधी मद्यपान केले, मग स्पामध्ये जाऊन…, प्रेयसीसमोरच चुलबुल पांडेची निर्घृण हत्या, वरळीत हत्येचा थरार!

मोडक सागरही भरून वाहू लागला

मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ७ पैकी एक मोडक-सागर धरणही गुरुवारी सकाळी १०.४० च्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागले आहे. मुंबईकरांची तहान भागविणारे सातपैकी चौथे मोडक सागर धरण भरून वाहू लागले आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक महत्त्वाचे मोडकसागर धरण ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर आहे. या धरणातून दरदिवशी ४५५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा

उर्ध्व वैतरणा – ३४.१३ टक्के
मोडक सागर – ९८.६६ टक्के
तानसा – ९९.१८ टक्के
मध्य वैतरणा – ६३.३२ टक्के
भातसा – ६४.०९ टक्के
विहार – १०० टक्के
तुळशी – १०० टक्के