लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी ५२.६९ टक्के, तर उपनगर जिल्ह्यातील २६ मतदारसंघांमध्ये सरासरी ५५.६६ टक्के मतदान झाले. मतदानाची सरासरी टक्केवारी ६० टक्क्यांपर्यंतही पोहोचली नसली तरी २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये मतटक्का वाढलेला आहे. मात्र उपनगरांतील चांदिवली आणि अणुशक्तीनगर या मतदारसंघांचा अपवाद आहे.

राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
Delhi Assembly Elections 2025 Seven AAP MLAs resign
‘आप’च्या सात आमदारांचे राजीनामे; पक्ष नेतृत्व विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
new income tax bill latest news in marathi
विश्लेषण : नवीन प्राप्तिकर विधेयक यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात? प्राप्तिकरात कपातीची शक्यता किती?

विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मतदारसंघनिहाय आकडेवारी पुढे आली. त्यानुसार मुंबईतील मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. यावेळी मुंबई महापालिकेने मतदानासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवली होती व विशेष सुविधाही दिल्या होत्या. त्यामुळे मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसत होती. मतदारांच्या रांगा कुठेही दिसल्या नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साह नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र गुरुवारी संध्याकाळी उशीरापर्यंत अंतिम आकडेवारी उपलब्ध होऊ लागली. त्यानुसार २०१९ च्या मतटक्क्याच्या तुलनेत मतदान वाढलेले दिसत आहे. सर्वच मतदारसंघात सुमारे चार टक्के मतदान वाढले आहे. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा नक्की कोणाला मिळणार हे आता मतमोजणीच्या दिवशीच समजू शकणार आहे.

आणखी वाचा-मुंबई : इन्फ्लूएंझाने होणाऱ्या मृत्यूत वाढ, गतवर्षाच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण अधिक

अंधेरी पश्चिम आणि वर्सोवामध्ये मतदानाच्या टक्क्यात सर्वाधिक वाढ

पश्चिम उपनगरातील अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा परिसरात मतदानाचा टक्का वाढला आहे. वर्सोवामध्ये कमी मतदान झाले असले तरी गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी मतटक्का वाढला आहे. तर अंधेरी पश्चिममध्ये मतदारांची संख्या कमी झाल्यामुळे मतटक्का वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

सर्वात जास्त मतदार असलेल्या चांदिवलीत मतटक्का घटल्याचे दिसत आहे. चांदिवली परिसरात सर्वाधिक साडेचार लाख मतदार आहेत. मात्र या ठिकाणी यावेळी ५०.०७ टक्के मतदान झाले. गेल्या वेळेपेक्षा मतदानात घट झाली. चांदिवली मतदारसंघात सात ठिकाणी क्रिटिकल मतदान केंद्रे आहेत. या भागात तुलनेत १० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान होते.

२०१९ च्या तुलनेत कुठे किती वाढ

सर्वाधिक वाढ

अंधेरी पश्चिम – ९.४७ टक्के
गोरेगाव – ८.९८ टक्के
वर्सोवा – ८.८२ टक्के

मतटक्का घटला

अणुशक्तीनगर – १.३० टक्के
चांदिवली – १.६९ टक्के

शहर भागात

माहीम – ५९.०१ टक्के
वडाळा – ५७.६७ टक्के
वरळी – ५३.५३ टक्के
शिवडी – ५५.५२ टक्के
उपनगर भागात
भांडूप – ६१.१२ टक्के
बोरिवली – ६०.५ टक्के
मुलुंड – ६०.४९ टक्के

आणखी वाचा-मालमत्ता कर बुडव्या बड्या थकबाकीदारांना महापालिकेकडून जप्तीची नोटीस

सर्वात कमी मतदान

शहर भागात

कुलाबा- ४४.४४ टक्के
मुंबादेवी – ४८.७६ टक्के

उपनगरात

चांदिवली – ५०.०७ टक्के
वर्सोवा – ५१.२ टक्के
मानखुर्द शिवाजी नगर- ५२ टक्के

Story img Loader