मुंबई : मोसमी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हवामान विभागाचा मुंबईतील मुसळधार पावसाचा अंदाज फोल ठरला. यंदा वेळेआधीच दाखल झालेल्या मोसमी पावसाने दडी मारली असून मुंबईत पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, सोमवारपासून मुंबईत मोसमी पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. परंतु, सोमवारी संपूर्ण दिवस मुंबईकरांना पावसाच्या धारांऐवजी घामाच्या धारांचा सामना करावा लागला.

मुंबई आणि उपनगरांत काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. मात्र, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढल्याने हा संपूर्ण आठवडा मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. परंतु, सोमवारी मुंबईत संपूर्ण दिवसभर नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. पावसाने विश्रांती घेतल्याने ऐन पावसाळ्यात कमाल तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे.

Mumbai, rain, city, suburbs,
… अखेर मुंबईत परतला, शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Monsoon Returns in maharashtra, Meteorological Department Issues Thunderstorm Warning for Maharashtra, Marathwada, konkan, central Maharashtra, monsoon news, marathi news,
सावधान ! वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
Heavy Rains in Mumbai, Heavy Rains in Mumbai Suburbs, Meteorological Department Predicts Continued Showers in Mumbai, Meteorological Departmen, mumbai rain, monsoon in mumbai,
मुंबईत पावसाची संततधार
Heavy Rains in thane, heavy in palghar, heavy rains warning for thane and palghar, Meteorological Department, monsoon in thane, monsoon in palghar, monsoon news,
ठाणे, पालघर जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा
Meteorological Department has predicted that intensity of rain will increase in state from June 22
राज्यात पावसाचा जोर वाढणार… वाचा कुठे दिलाय ‘ऑरेंज अलर्ट’?
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

हेही वाचा – मुंबई : रहदारीमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काय कारवाई केली ? तपशील सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

हेही वाचा – वस्तू सेवा कर परिषदेच्या बैठकीला अजित पवारांची दांडी; शरद पवार गटाची टीका

दरम्यान, मुंबईसह राज्यातील काही भागांत पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, पुणे, नाशिक, कोल्हापूर भागात गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.