लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील अपयश पुसून काढत राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी महायुतीचे वरिष्ठ नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. असे असताना अन्य काही नेते मात्र एकमेकांवर दुगाण्या झाडत असल्याचे चित्र आहे. सोमवारी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यावर कदम यांना थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला. निवडणूक लांबणीवर गेल्याने ही धुसफुस आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

sushma andhare replied to devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीस हेच ‘फेक नरेटिव्ह’चं महानिर्मिती केंद्र”; सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
bhopal 1800 crore drug case
धक्कादायक! १८०० कोटी रुपयांच्या ‘त्या’ ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने स्वत:वर झाडली गोळी; आधी पोलीस ठाण्यात शिरला, नंतर…
dcm devendra fadnavis virtually inaugurated Bolinj police Station in virar
आयुक्तालयातील १९ व्या पोलीस ठाण्याची निर्मिती; बोळींज पोलीस ठाण्याचे गृहमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
devendra fadnavis on women complaints
महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक सुविधा- महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश
union home minister amit shah remark india will be naxalism free by march 2026
मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त होणार काय? छत्तीसगडमध्ये आक्रमक नक्षलविरोधी कारवायांमुळे गृहमंत्र्यांचे वक्तव्य पुन्हा चर्चेत…
Mumbai Municipal Corporation will conduct a survey of sanitation workers Mumbai
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे महापालिका सर्वेक्षण करणार; विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन
navi mumbai Shiv Sena Shinde groups Vijay Mane threatened Satish Ramane controversy ensued
शिंदे गटाच्या शहरप्रमुखाचा पोलिसांसमोर थयथयाट नवरात्रोत्सवाची जागा, कमानी, दिव्यांचे खांब काढण्यावरून वादंग

गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून कदम यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर ‘चमकोगिरी’ करीत असल्याचा आरोप केला. तसेच फडणवीस यांनी चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही केली. या आरोपांना चव्हाण यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. ४० वर्षांत कदम यांनी कोकणासाठी काय केले हे सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले. कदम-चव्हाण या दोन कोकणी नेत्यांनी उणीदुणी काढल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला. ’रामदास कदम हे वारंवार टोकाचे बोलतात. त्यांची जी काही मते आहेत, ती त्यांनी पक्षांतर्गत बैठकांमध्ये मांडावीत, जाहीरपणे मते मांडू नयेत. प्रत्येक वेळी भाजपला वेठीला धरू नये. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा >>> चावडी: भजनाला आठ अन् भोजनाला साठ!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवेळी पुणे जिल्ह्यात भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले होते. मित्रपक्षांकडून झालेले हे वर्तन राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोंबले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिला वर्गाचा पाठिंबा मिळविण्याचे महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजित पवार गटाकडून या योजनेतील मुख्यमंत्री शब्दाचा उल्लेख केला जात नाही. याबद्दल शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. या घटनांवरून महायुतीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जुळलेली नसल्याचेच स्पष्ट होते.

राष्ट्रवादीशिवसेनेत वादंग

रायगड जिल्ह्यात तटकरे आणि शिंदे गटातील वाद कमालीचा विकोपाला गेला आहे. खोपाली-कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट तटकरे विश्वासघातकी असल्याचा आरोप केला. यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे. त्यावर थोरवे यांना आपण अजिबात महत्त्व देत नाही, असे प्रत्युत्तर तटकरे यांनी दिले.

रवींद्र चव्हाण केवळ ‘चमकोगिरी’करतात. फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. – रामदास कदम, शिंदे गट

रामदास कदमांनी आमदार, मंत्री म्हणून कोकणाच्या विकासासाठी काय केले, ते सांगावे. – रवींद्र चव्हाण, भाजप