ठाणे परिसरात पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे ही शासनाची भूमिका आहे. सध्या मीटर पद्धत नसल्याने नक्की कोण किती पाण्याचा वापर करते हे समजू शकत नाही. यामुळेच ठाणे महापालिकेने पाण्याच्या मीटर पद्धतीचा अवलंब करावा, अशी सूचना शासनाच्या वतीने बुधवारी ठाणे पालिकेला विधानसभेत करण्यात आली. ठाण्याची पाण्याची तहान भागविण्यासाठी काळू, शाई या धरणांची कामे लगेच मार्गी लागणे अशक्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील पाण्याच्या टंचाई संदर्भात प्रताप सरनाईक (शिवसेना), जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर ठाण्याच्या पाणीपुरवठय़ात लगेचच काही सुधारणा होण्याची शक्यता नगरविकास खात्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी फेटाळून लावली. मीरा-भाईंदरसाठी सूर्या धरणाची योजना प्रस्तावित असली तरी अजून काही परवानग्या मिळालेल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले. त्यावर वसई-विरारची सूर्याची योजना कार्यान्वित होते आणि मीरा-भाईंदरच्या योजनेला मान्यता का मिळत नाही, असा सवाल नरेंद्र मेहता (भाजप) यांनी केला. सरसकट तरण तलावांना पाणी बंद करू नये, अशी मागणी सरनाईक यांनी केली.
ठाणे शहराच्या पाणीपुरवठा योजनेत मोठय़ा प्रमाणावर गळती असून, ४० टक्के पाणी वापरावर महसूलच जमा होत नाही, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा