मुंबई : कमकुवत पाया आणि सदोष संरचनेमुळे घाटकोपरमधील छेडानगर परिसरातील महाकाय फलक पडल्याचा अहवाल व्हीजेटीआय संस्थेच्या दोन तज्ज्ञांनी दिला आहे. मुंबईला वादळी वाऱ्याचा धोका असतो. मात्र वादळी वाऱ्यात टिकेल इतक्या क्षमतेची या जाहिरात फलकाची संरचनात्मक बांधणी नव्हती, असा अहवाल या दोन तज्ज्ञांनी नुकताच पालिका प्रशासनाला दिला आहे.

घाटकोपरच्या छेडानगर येथे १३ मे रोजी महाकाय जाहिरात फलक पडून १४ जणांचा मृत्यू झाला. भविष्यात असा प्रसंग घडू नये यासाठी या दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण शोधण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने व्हीजेटीआय या संस्थेची मदत घेतली होती. त्याकरिता पालिका प्रशासनाने संस्थेच्या संरचनात्मक अभियांत्रिकी (स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग) विभागाच्या प्रमुखांना पत्र लिहिले होते. या दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण शोधण्याच्या दृष्टीने हा अभ्यास करण्याची विनंती पत्रात करण्यात आली होती. संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख केशव सांगळे आणि डॉ. अभय बांबोले यांनी या दुर्घटनेतील तांत्रिक कारणांचा अभ्यास करून नुकताच आपला अहवाल सादर केला आहे.

vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
rumor, Vishal Agarwal absconding, pimpri chinchwad police, porsche car accident
विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार? पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला खूलासा…
sai tamhankar bus incident
“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग
Worli sea face
मुंबईतील सी व्ह्यू घराची किंमत किती असेल? प्रसिद्ध उद्योगपतीने घेतला ‘इतक्या’ कोटींचा फ्लॅट; स्टॅम्प ड्युटीच भरला ५ कोटींचा!
Mumbai, Metro 2A, Metro 7,
मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका : दोन्ही मार्गिकेच्या दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ, आता ‘इतकी’ दैनंदिन प्रवाशी संख्या
Mumbai, municipal commissioner,
मुंबई : पालिका आयुक्तांनी बोलावल्यानंतरही बैठकीला गैरहजर राहणे अधिकाऱ्याला महाग पडले; अनधिकृत बांधकामांना अभय देणे भोवले
constructions, Goregaon-Mulund,
गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाआड येणारी बांधकामे हटवली, प्रकल्पाच्या कामाला वेग

हेही वाचा…मुंबई : शिवडीतील हत्येप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

केवळ प्रति तास ४९ किमी एवढ्या वाऱ्याचा वेग सहन करेल एवढीच या जाहिरात फलकाची क्षमता होती. मात्र १३ मे रोजी प्रति तास ८७ किमी एवढ्या वेगाने वारे वाहत होते. या वाऱ्यामुळे हा फलक उभा राहू शकला नाही, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. मुंबई शहर सागरी किनारपट्टीच्या जवळ असल्यामुळे प्रति तास १५८ किमी एवढ्या वादळी वाऱ्यात उभे राहू शकेल अशाच पद्धतीने फलकांची संरचना असायला हवी, असेही या अहवालात म्हटले आहे. मात्र घाटकोपरचा जाहिरात फलक हा मजबूत नव्हता. दोषपूर्ण संरचनेमुळे हा फलक पडल्याचे या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा…सावंत यांना वरळीतून कमी मताधिक्य; मुंबादेवी, भायखळ्यातील मताधिक्यामुळे विजय सुकर

मालाडमध्ये फलक हटविताना एक जखमी

मालाड येथील लिबर्टी मार्गावरील जवाहरलाल नेहरू क्रीडांगणानजीकचा पालिकेने नोटीस बजावलेला अनधिकृत डिजिटल फलक बुधवारी रात्री आठच्या सुमारास हटविताना कोसळला. हा फलक महेंद्र कुर्ले (६२) यांच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत ते जखमी झाले. त्यानंतर त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात जयकिरण कन्स्ट्रक्शनचे विकासक आणि संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर, पालिकेने अनधिकृत फलकांविरोधातील कारवाईला वेग देत अनेक अनधिकृत फलक हटविले. अद्यापही अनधिकृत फलक हटविण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे. दरम्यान, जयकिरण कंपनीने इमारत बांधकाम स्थळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेतली नव्हती. त्यानंतर नोटीस पाठवली होती.