मुंबई : मागील काही दिवस मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात घट झाल्यामुळे दिवसभर दिलासादायक वातावरण होते. पहाटेचा गारवा आणि संपूर्ण दिवसभर गार वारा असल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळात होता. दरम्यान, पुढील दोन दिवस मुबंईच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे दुपारी उन्हाचा झळा वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईत फेब्रुवरी महिन्याच्या सुरुवातीला उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने शहर आणि उपनगरात किमान तापमानाचा पारा २० अंशाखाली उतरला आहे. यामुळे संपूर्ण दिवसभर वातावरणात गारवा निर्माण होऊन मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, शुक्रवार ते रविवार या कालावधीत मात्र मुंबईतील तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३६ अंशादरम्यान राहील. त्यामुळे या कालादीत दुपारी मुंबईकरांना उन्हाच्या झळा सहन करावा लागणार आहेत. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३० अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील कमाल तापामान सरासरीपेक्षा ३.५ अंशानी अधिक होते. किमान तापामानाचा पारा जरी २० अंशावर असला तरी दिवसभरातील तापमानामुळे उकाडा सहन करावा लागणार आहे.

nisargalipi A sign of arrival of spring season
निसर्गलिपी : वसंतागमनाची चाहूल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Patients of cold cough fever in every house of Nagpur
नागपुरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण… तापमान बदलामुळे…
India Climate Change Inflation Agriculture Farmers
व्यवसायाभिमुख पिके हवीत!
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!

राज्यात पुढील चार ते पाच दिवस कोरड्या हवामानासह कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक भागात गुरुवारी कमाल तापमान ३४ अंशाहून अधिक नोंदले गेले.

Story img Loader