मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी प्रवास मिळावा यासाठी लोकल, मेल / एक्स्प्रेस, तसेच पॅसेजर रेल्वे आणि सुट्टीकालीन विशेष ट्रेनमधील विनातिकीट / अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. एप्रिल, मे २०२४ मध्ये पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने अनेक तिकीट तपासणी मोहीम राबविल्या.

हेही वाचा >>> पवई दगडफेक प्रकरणी दोन गुन्हे दाखल; ५० हून अधिक व्यक्तींना अटक

NEET, Hasan Mushrif,
‘नीट’ परीक्षा तात्काळ रद्द करावी, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Workers shift belongings during an anti-encroachment drive at Jai Bhim Nagar slum colony, Powai, in Mumbai.
पवई दगडफेक प्रकरणी दोन गुन्हे दाखल; ५० हून अधिक व्यक्तींना अटक
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
maharashtra ministers in modi govt
मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळांकडे मोठी जबाबदारी? महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांकडे कोणती खाती?
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा

याद्वारे पश्चिम रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना पकडून एप्रिल, मे या दोन महिन्यात ३८ कोटी रुपये दंड वसूल केला. मे २०२४ मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह २.८० लाख विनातिकीट / अनियमित प्रवाशांना पकडून १७.१९ कोटी रुपये वसूल करण्यात आले. याशिवाय मे महिन्यात पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात एक लाख प्रकरणे शोधून ४.७१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी भरारी पथकाद्वारे तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमांद्वारे एप्रिल – मे या कालावधीत ८,५०० विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच, त्यांच्याकडून २९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.