मुंबई : आजघडीला देशात ६० वर्षांवरील वृद्धांची संख्या १४९ दशलक्ष एवढी असून २०५० मध्ये वृद्धांची संख्या दुप्पट होणार आहे. सामान्यता वृद्धापकाळात अनेक प्रकारचे आजार होतात, याचा विचार करता त्यांच्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत स्वतंत्र जेरियाट्रिक (वृद्धांचे आरोग्य) विभाग असणे आवश्यक आहे तसेच सरकारने वृद्धांच्या आरोग्यासाठी अर्थसंकल्पात ठोस व्यवस्था करण्याची गरज आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करत असून वृद्धांच्या आरोग्यविषयक व सामजिक सुरक्षेची हमी या जाहीरनाम्यात दिली जाणार का, असा कळीचा प्रश्न आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. मोफत धान्यासह अनेक मोफत विषयक घोषणा सध्या राजकीय नेते करताना दिसतात तसेच त्यांच्या जाहिरनाम्यातही मोफतची वचने दिसतात. मात्र वृद्धांच्या आरोग्याच्या हमीची ठोस भूमिका कोणीच घेताना दिसत नाही, असेही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा