लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : स्त्रियांच्या आरोग्याविषयीची अनेक पुस्तके आहेत, परंतु “स्त्रियांचे आरोग्य” हे पुस्तक नेमकी माहिती देते. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्त्रियांच्या पर्समध्ये राहील अशा आकाराचे आहे. त्यामुळे ते हवे तेव्हा वाचता येईल. हे पुस्तक फार महत्त्वाचे असून, सोप्या भाषेत लिहिलेले आहे, असे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.

Rohit pawar on Tanaji Sawant
“मुख्यमंत्री साहेब, हीच तुमच्या महायुती सरकारची क्वालिटी का?” शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून रोहित पवारांचं टीकास्र!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
shivajinagar to swargate metro
मेट्रो सुरु करा, पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन
Ramdas athawale, Dahanu,
महायुतीमध्ये मी असताना राज ठाकरेंची गरज काय – रामदास आठवले
Vanchit Bahujan aghadi agitation against senior literary figure in Nagpur
नागपुरातील ज्येष्ठ साहित्यिकाच्या विरोधात वंचितचे आंदोलन, निवासस्थानी पोलीस तैनात
cbi arrests rg kar ex principal and psi
कोलकाता बलात्कार प्रकरणी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यासह पोलीस निरीक्षकाला अटक; पुराव्याशी छेडछाड केल्याचा आरोप
maharashtra sahitya parishad
‘मसाप’च्या वार्षिक सभेत गोंधळ, सभासदाने समाजमाध्यमात बदनामी केल्यावरून वादंग, संबंधिताचे सभासदत्व रद्द
Wardha, Narendra Modi, Nitesh Karale master,
वर्धा : सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन् संतप्त मात्र कराळे गुरुजी! काय आहे कारण?

ग्रंथालीने प्रसिद्ध केलेल्या डॉ. राजश्री कटके लिखित “स्त्रियांचे आरोग्य” या पुस्तकाचे प्रकाशन १२ जून रोजी, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विधान परिषदेच्या आमदार भारती लव्हेकर, डॉ. तात्याराव लहाने, पद्मा धामणे राव, पत्रकार राही भिडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सुदेश हिंगलासपूरकर, डॉ. कटके यांच्या मातोश्री आणि सासरे मंचावर उपस्थित होते.

आणखी वाचा-नीट परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, पुनर्परीक्षा घेण्याची इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सची मागणी

समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या उपचारांबाबतच्या चित्रफिती प्रसारित होत असतात. त्यासाठी तपासणी करण्याबाबत सुचवले जाते. मात्र त्यात किती तथ्य असते याचा विचार करायला हवा, असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.यावेळी लेखिका डॉ. राजश्री कटके यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज दळवी यांनी केले.