भारतीय संविधानावरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी भाजप व शिवसेनेला दिला आहे.  केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी प्रसिद्धीस दिलेल्या जाहिरातीतून संविधानाच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शब्द वगळले. त्यावरुन आता राजकीय वाद पेटला आहे. रिपब्लिकन पक्ष हा राज्यात भाजपचा मित्र पक्ष आहे. मात्र आठवले यांनी त्या जाहिरातीतून धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शब्द वगळल्याबद्दल केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. संविधानाच्या सरनाम्यातील हा केवळ शब्द वगळण्याचा प्रश्न नाही तर, हा संविधानिक मुल्यांवर हल्ला आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे.

Story img Loader