लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा अखेर पार करण्यात आला आहे. ठाणे – भिवंडी या पहिल्या टप्प्यातील सर्व स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्थानकातील अंतिम कामे आणि रुळ बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने ठाणे २४.९०किमीची ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५ मार्गिकेच्या कामाला सुरुवात केली आहे. या मार्गिकेचे दोन टप्प्यात काम करण्यात येत आहे. यातील पहिला टप्पा ठाणे – भिवंडी असा असून दुसरा टप्पा भिवंडी – कल्याण असा आहे. पहिल्या टप्प्याचे काम सध्या सुरू असून दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणे बाकी आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्याचे आतापर्यंत एकूण ८१.५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील सहा मेट्रो स्थानकांचे ७६.९३ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचवेळी व्हायडक्टचे ८२.६३ टक्के काम पूर्ण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे सहा स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण करून एमएमआरडीएने कामातील एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
आणखी वाचा-मुंबई: विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या स्कुल व्हॅन चालकाला अटक
पहिल्या टप्प्यात बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पुर्णा, अंजूरफाटा आणि धामणकर नाका या सहा स्थानकांचा समावेश आहे. या सहा स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता स्थानकांतील फ्लोरींग, फॉल सीलिंग, दर्शनी भाग यांसारख्या कामांना सुरुवात होणार आहे. तसेच रुळ आणि विविध यंत्रणांच्या कामालाही सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील ही स्थानके सुमारे