मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. या अपघातानंतर आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, २४ तासांच्या आतच त्याला जामीन मिळाला. यानंतर विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

हेही वाचा – Worli Hit and Run Case: मुंबई हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाह आहे तरी कोण?

Sainath tare joined uddhav Thackeray s shivsena
कल्याण: बलात्काराचा गुन्हा दाखल साईनाथ तारे यांना ठाकरे गटात प्रवेश दिल्याने तीव्र नाराजी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Rape on Finance News
Rape on Finance : लग्न ठरलेल्या पत्नीवर होणाऱ्या पतीने केला जनावराप्रमाणे चावे घेऊन बलात्कार, त्यानंतर मित्रांकडे सोपवलं आणि..
case registered against two people,young man died due to electric shock in pune
पुणे : फलक लावताना विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू, दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
Sharmila Thackeray on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Sharmila Thackeray : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शर्मिला ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे…”
Youth dies in dog attack Mumbai news
मुंबई: श्वानाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
Pune suicide, wife s affair, Pune Man Commits Suicide Lonikand police, abetment to suicide, complaint, investigation
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
Two sent to Yerawada jail in Kalyaninagar accident case Pune news
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोघांची येरवडा कारागृहात रवानगी

दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे पती प्रदीप नाखवा यांनीही या जामिनावर नाराजी व्यक्त करत याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. पीटीआयला त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांचा आक्रोश अशरक्षः मन हेलावून टाकणारा होता.

नेमकं काय म्हणाले प्रदीप नाखवा?

“मी त्याला ( आरोपीला ) गाडी थांबवण्याची विनंती करत होतो. मी त्याच्या गाडीच्या बोनेटवर जोरात हात मारला. मात्र, तरीही त्याने गाडी थांबवली नाही. तो भरधाव वेगाने गाडी चालवत होता. त्यावेळी तिला ( महिलेला ) किती वेदना झाल्या असतील? हे सर्वांना माहिती आहे. मात्र, कोणीही कारवाई करायला तयारी नाही. गरीबांसाठी या देशात कुठेही न्याय नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राजेश शाहांना मिळालेल्या जामिनावर म्हणाले…

राजेश शाहांना मिळालेल्या जामिनावर बोलताना ते म्हणाले, “या सगळ्याला प्रशासन जबाबदार आहे. हे प्रशासन फक्त श्रीमंत लोकांसाठी काम करतं. इथे गरिबांना कुणीही वाली नाही. इथे फक्त राजकारण चालतं”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Worli Hit And Run Case : राजेश शाहांना २४ तासांच्या आत दिलासा, १५ हजारांच्या तात्पुरत्या बाँडवर जामीन मंजूर

दरम्यान, याप्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह अद्यापही फरार आहे. त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. या प्रकरणात राजेश शाह आणि त्यांच्या वाहनचालकाला अटक झाली. मात्र, न्यायालयाने राजेश शाह यांना जामीन मंजूर केला.