गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांबाबत अपमानास्पद वक्तव्ये करण्यात येत असून त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापू लागले आहे. विरोधक सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरूषांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांच्या निषेधार्थ पुण्यापाठोपाठ गुरुवारी मुंबईतील वरळी परिसरात आंबेडकरवादी, बहुजन आणि इतर समविचारी संघटनांनी बंद पुकारला आहे.

हेही वाचा >>>लालबागमधील अविघ्न पार्कमध्ये पुन्हा एकदा आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Three drunken arrested for assaulting policemen
मद्यपींची पोलिसांना धक्काबुक्की; तिघे अटकेत
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Chemicals are now used to eliminate mosquitoes in vasai
वसई : डास निर्मूलनासाठी आता रसायनाचा वापर, डासांचा प्रभाव असलेली ९९ ठिकाणी निश्चित
Court comments on demolishing rehabilitation building in Maharashtra Sadan objecting to municipality actions
महाराष्ट्र सदन प्रकरणातील पुनर्वसन इमारत पाडण्याच्या कारवाईवर न्यायालयाचे ताशेरे
Vishnu Gupta Attack
अजमेर दर्ग्याखाली शिव मंदिर असल्याचा दावा करणाऱ्या विष्णू गुप्तांच्या कारवर गोळीबार, थोडक्यात बचावले

वरळी परिसरात गुरुवारी सकाळी ७ पासून बंद पाळण्यात येत आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, शातता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सकाळपासूनच वरळी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदला वरळीकरांनी प्रतिसाद दिला असून परिसरातील बहुतांश दुकाने बंद ठेऊन दुकानदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. वरळीमधील केवळ औषध आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी आहेत. वरळी परिसरात विविध कंपन्यांची कार्यालये असून कार्यालयात जाणाऱ्यांची वर्दळ रस्त्यावर दिसत आहे.

हेही वाचा >>>मुंबई: ऐन गर्दीच्या वेळी हार्बर, ट्रान्स हार्बर रेल्वे विस्कळीत

तीन दिवसांपूर्वीच वरळीतील आंबेडकरवादी, बहुजन आणि इतर समविचारी संघटनांनी ‘वरळी बंद’ची हाक दिली होती आणि वरळीत ठिकठिकाणी फलक लावून नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. तर या बंदचे फलक सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल केले गेले आहेत.

Story img Loader