चंद्रपूर: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीचे संरक्षण करण्यासाठी कुंपणात अवैध विद्युत प्रवाह साेडल्यामुळे २०२२ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १२ शेतकऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्हयात शेतकऱ्यांमार्फत जंगली प्राण्यांपासून शेती व पिक चे संरक्षणार्थं शेती कुपणास अवैध विद्युत तारेची जोडणी करुन विद्युत प्रवाह सोडल्यामुळे अनेक शेतकरी, गुराखी आणि प्रसंगी स्वतः शेत मालकास विनाकारण आपला जीव गमवावा लागला आहे. चंद्रपूर जिल्हयात २०२२ ते माहे ऑगष्ट २०२३ या कालावधीत शेत मालकाच्या अवैध विद्युत प्रवाह हलगर्जीपणा, गैरवापरामुळे एकुण १३ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

VIDEO: तेल गेले, तूपही गेले..! चोरट्यांनी एटीएमला चक्क दोरीने बांधून…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Highly educated youth participate in sheep fighting in Dombivli News
डोंबिवलीत मेंढ्यांच्या झुंजी लावण्यात उच्चशिक्षित तरूणांचा सहभाग; ३० जणांवर प्राणी इजा प्रतिबंधक कायद्याने गुन्हे दाखल
Who collected penalty of 60 lakhs in month from people who throw garbage
कचरा करणाऱ्यांकडून एका महिन्यात ६० लाखांची दंडवसुली कोणी केली?
Which schools in Wardha district have water that is dangerous to drink
धोकादायक! ‘या’ शाळांतील पाणी पिण्यास घातक, जीवावर बेतणार…
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?
Transport e-challans worth Rs 2500 crore pending across the state
दंडात्मक कारवाईला ‘खो’; राज्यभरात अडीच हजार कोटींवर वाहतूक ई-चालान प्रलंबित
19 to 20 people die in road accidents every month
ठाणे : प्रत्येक महिन्यात १९ ते २० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

हेही वाचा… गोंडवाना विद्यापीठाचा निकाल धक्कादायक! ७४ हजार विद्यार्थ्यांपैकी ५२ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण

याप्रकरणी संबंधित विद्युत प्रवाह सोडणाऱ्या शेत मालकांविरुध्द कलम “सदोष मनुष्य वध” गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन ज्यात आजन्म कारावासाची सुध्दा शिक्षा होवु शकते. अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुध्दा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जंगली प्राण्यापासुन शेती व पिकाची सुरक्षिततेकरीता शेती कुंपणाला विद्युत प्रवाह तार जोडुन जिवंत विद्युत प्रवाह सोडु नये, अन्यथा संबंधीतांविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी दिला आहे.

Story img Loader