लोकसत्ता टीम

नागपूर : भारत जोडो यात्रेदरम्यान ८ नोव्हेंबर २०२२ रोजी राहुल गांधींसोबत पदयात्रा करताना नागपूरचे काँग्रेस कार्यकर्ते कृष्णकुमार पांडे यांचे निधन झाले होते. यावेळी राहूल गांधी यांनी पांडे कुटुंबीयांना सांत्वनपर भेटीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राहुल गांधी यांनी गुरूवारी नागपुरात पांडे कुटुंबीयांची भेट घेत २५ लक्ष रुपयांची मदत म्हणून धनादेशही दिला.

devendara fadnavis said nagpur is unique chhatrapati shivaji maharaj brought tigers claws to defeat Afzal Khan
फडणवीस म्हणाले, “नागपूर आमचे वेगळेच शहर, अजब…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Rwanda backed rebels enter in Congo city
आफ्रिकेत पुन्हा संहाराची चाहूल
Namdev Shastri Maharaj kirtan on Bhandara mountain postponed
पिंपरी : नामदेव महाराज शास्त्री यांचे भंडारा डोंगरावरील कीर्तन रद्द
baba amte loksatta news
वंचितांच्या सेवेची पंचाहत्तरी…
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Abhyudayanagar redevelopment plan news in marathi
अभ्युदयनगर पुनर्विकास : विकासकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने निविदेला मुदतवाढ देण्याचे सत्र सुरूच

काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त काँग्रेस नेते राहूल गांधी गुरूवारी नागपुरात आले होते. याप्रसंगी कृष्णकुमार पांडे कुटुंबाला सभास्थळी बोलावून घेण्यात आले होते. यावेळी राहुल गांधी पांडे कुटुंबीयांना व्यासपिठाच्या मागे बनवलेल्या ग्रीन रुममध्ये भेटले. काही निवडक नेत्यांच्या उपस्थितीत ही भेट झाली. याप्रसंगी राहूल गांधी यांनी गेले एक वर्ष ते सांत्वनासाठी का येऊ शकले नाही? याबाबत सांगितले. सोबत पांडे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची माहिती घेत एका वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २५ लाखांचा धनादेश दिला.

आणखी वाचा-“काँग्रेसला संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण…”, अशोक चव्हाणांची सत्ताधाऱ्यांवर टीका

दरम्यान, भारत जोडो यात्रेदरम्यान ८ नोव्हेंबर २०२२ रोजी राहुल गांधींसोबत पदयात्रा करताना नागपूरचे काँग्रेस कार्यकर्ते कृष्णकुमार पांडे यांचा निधन झाले होते. तेंव्हा भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या श्रद्धांजली सभेत राहुल गांधी यांनी पांडे कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी लवकरच नागपुरात येईन, असे म्हटले होते. तसेच काँग्रेस पक्षाने पांडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा शब्दही दिला होता. त्यानुसार ही भेट झाली.

Story img Loader