गडचिरोली: सिरोंचा तालुक्यातील चिटूर येथून शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमावरून ट्रॅक्टरने परत येत असताना झालेल्या अपघातात तीन महिला ठार, तर ३० जण जखमी झाल्याची घटना रंगधामपेठा चेक गावाजवळ घडली.

शासनाने विविध योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रम चिटुर येथे आयोजीत केला. या कार्यक्रमात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लक्ष्मीदेवपेठा येथील ३० जण ट्रॅक्टरमध्ये बसून चीटूरला गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येत असताना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास रंगधामपेठा चक गावाजवळ ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटले. यात ट्रॅक्टरमध्ये बसलेले तीन वृद्ध महिला ठार तर ३० जण जखमी झाले. त्यांना तत्काळ अंकिसा प्राथमिक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Administrative Officer of Sassoon Hospital along with 16 employees embezzled Rs 4 Crore 18 Lakhs Pune news
‘ससून’चा पैसा सगळे मिळून खाऊ! रुग्णालयातील ४ कोटी रुपयांना असे फुटले पाय…
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Delay to Veterinary Hospital in Vasai Virar
वसई-विरारमधील पशुवैद्याकीय रुग्णालयाला विलंब
12 lakh fraud by cyber thieves Pune news
मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वाॅरंटची बतावणी; सायबर चोरट्यांकडून एकाची १२ लाखांची फसवणूक
Police patrol J J Hospital, Mumbai,
मुंबई : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जे.जे. रुग्णालयात पोलीस घालणार गस्त
49 lakh fraud with the lure of a job in a military hospital
लष्करी रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने ४९ लाखांची फसवणूक
The state government has decided to take out insurance for Asha workers and group promoters in the state of Maharashtra Mumbai news
राज्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचा काढणार विमा
Nagpur, cyber crime, financial fraud, sextortion, Maharashtra, Mumbai, Pune, Nagpur, trained staff, cyber police, public awareness, cyber crime news
सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळ्यात अडकविण्यासाठी करतायेत तरुणींचा वापर; दिवसाला शेकडोंवर…

हेही वाचा… अकोला : प्रस्थापितांपुढे नवख्यांचे आव्हान, सहकार क्षेत्रातील हालचालींना वेग

यातील १५ ते १६ जणांना सिरोंचा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यातील जखमींची नावे कळली नसून हे सर्व जण लक्ष्मीदेवपेठा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. सोयीच्या गावी हा कार्यक्रम घेणे शक्य असताना जिथे जाण्यासाठी रस्ता नाही अशा ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.