लोकसत्ता टीम

अमरावती: अमरावती विभागात जुलै महिन्‍यात अतिवृष्‍टीने कहर केला. गेल्‍या आठवडाभरात तर ३७ तालुक्‍यांमधील तब्‍बल १९० मंडळांमध्‍ये अतिवृष्‍टीची नोंद झाली. यंदाच्‍या पावसाळ्यात आतापर्यंत ३१ जणांचा मृत्‍यू झाला असून ९ हजार ४८६ नागरिकांना विस्‍थापित व्‍हावे लागल्‍याने त्‍यांना तात्‍पुरत्‍या निवाऱ्यामध्ये आश्रय घ्‍यावा लागला.

For three years promotion of post of Superintendent Engineer in Water Resources Department was stalled
तीन वर्षांपासून जलसंपदा विभागात अधीक्षक अभियंता पदाची पदोन्नती रखडली
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Heavy rains in Akola damaged crops over 57 758 5 hectares in August and September
अकोला : अतिवृष्टीमुळे ५७ हजार हेक्टरवरील पिके मातीत; ऐन सणासदीच्या काळात….
Dairy Development Project expand from 11 to 19 districts in Vidarbha and Marathwada
दुग्धविकास प्रकल्पाची व्याप्ती वाढली; शेतकऱ्यांना १३,४०० दुधाळ जनावरांचे…
heavy rain Gondia district,
गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचे चार बळी, ६९ जणांना वाचवले
rain water enter in hospitals in gondia
गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती,अनेक मार्ग बंद, रुग्णालयात पाणी,रुग्णांचे हाल..
tribal development department
आश्रमशाळांमध्ये परिचारिकांची पदे भरणार, आदिवासी विकास विभागाचा निर्णय
Mukhyamantri Yojana Doot initiative to inform people about various schemes of government
नागपूर : योजनादूतांना दरमहा १० हजार, ‘ येथे ‘संपर्क साधा

गेल्‍या जून महिन्‍यात केवळ ४८.६ मिमी म्‍हणजे सरासरीच्‍या तुलनेत केवळ ३३ टक्‍के पाऊस झाला होता. जुलैच्‍या पावसाने ही तूट भरून काढली, पण सोबत अनेक भागात अतिवृष्‍टीचा तडाखा बसला. आतापर्यंत विभागात ३९४ मिमी म्‍हणजे सरासरीच्‍या १११ टक्‍के पाऊस बरसला आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजता संपलेल्‍या चोवीस तासांत सर्वाधिक ३९.४ मिमी पावसाची नोंद यवतमाळ जिल्‍ह्यात झाली असून अमरावती ३.८, वाशीम ३.५, अकोला १.५ तर बुलढाणा जिल्‍ह्यात ०.१ मिमी पाऊस झाला.

आणखी वाचा-रिमझिम पावसाने वाशिम जिल्हा चिंब; कुठे दमदार तर कुठे तुरळक पाऊस!

विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्‍या प्राथमिक अहवालानुसार विभागात २१ व २२ जुलै रोजी यवतमाळ, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. नदी-नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी गावात, शेतांत शिरले. त्यामुळे सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात १०, अकोला जिल्ह्यातील ५ व बुलडाणा जिल्ह्यातील ४ तालुके बाधित झाले. या गावांतील तब्बल ५५२ नागरिकांना एसडीआरएफ व डीडीआरएफच्या बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील २९०, बुलडाणा जिल्ह्यातील २३२ व अकोला जिल्ह्यातील ३२ जणांचा समावेश आहे.

६ लाख १७ हजार ९४७ हेक्टर शेती बाधित

अमरावती जिल्ह्यात ४४ हजार ८७४ हेक्टर, अकोला १ लाख ४२ हजार ७८२ हेक्टर, यवतमाळ २ लाख १८ हजार हेक्टर, वाशीम ४७ हजार ६४३ तर बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६४ हजार ६७७ हेक्टर शेतजमिनीचे क्षेत्र बाधित झालेले आहे. यामध्ये २२ हजार ४०३ हेक्टर शेती पुरामुळे खरडून गेलली आहे. याशिवाय पाच जिल्ह्यांतील ७२ रस्ते व नदी-नाल्यांवरील ११८ पुलांचे मोठे नुकसान झाले आहे.