चंद्रपूर : ३३ केव्ही एटापल्ली उपकेंद्रातून निघणाऱ्या ३३ केव्ही जांबिया गट्टा वीज वाहिनीवर साप चढला. विजेच्या धक्क्याने या सापाचा तर मृत्यू झाला. मात्र त्यामुळे ५० रोहित्रांचा वीजपुरवठा ख्ंडीत झाला व आसपासची ३३ गावे अंधारात गेली. यामुळे १ हजार ८८५ ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित झाला.

वरिष्ठ तंत्रज्ञांनी पोलवर चढून मृत अवस्थेत असलेला साप काढून घेतला तसेच हेडरी गावापुढे या वीज वाहिनीच्या तारा तुटलेल्या होत्या ते जोडण्यासाठी संबंधित वरिष्ठ तंत्रज्ञ आणि विद्युत सहाय्यक गेले आणि दुपारी एक वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. साप मृत का असेना भितीसोबत वीजखांबावर चढणे धोकादायकच असते. या पार्श्वभूमीवर लाईनमॅनने केलेल्या कामाची प्रशंसा होत आहे.

Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Bhandara, woman deadbody , tiger attack, tiger ,
भंडारा : वाघाच्या हल्ल्यात ठार महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास संतप्त ग्रामस्थांचा नकार, पोलीस ठाण्यात…
Cowherd died , tiger attack, Chandrapur,
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
Container Truck Collides With Multiple Vehicles near the khambatki tunnel
खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकरसह तीन मोटारींचा अपघात; जिवीतहानी टळली, मोटारीचे मोठे नुकसान
Explosion at Chandrapur power station 500 MW unit shut down Power station keeps secrecy
चंद्रपूर वीज केंद्रात स्फोट, ५०० मेगावॉटचा संच बंद; वीज केंद्राकडून गुप्तता…
bhandara blast 8 died
भंडारा आयुध निर्माणीत स्फोट; आठ ठार
Villagers shared their experience after explosion in ordnance manufacturing company Bhandara
जोरदार आवाज झाला, पत्रे उडाले; स्फोटानंतर ग्रामस्थांनी सांगितला अनुभव

हेही वाचा – भंडारा: पाय घसरल्याने शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

नुकतेच वाघाच्या पंजाचे निशानही आढळले होते. तर चार पाच दिवसांपूर्वी धानोरा उपकेंद्रात हत्ती शिरले होते. महावितरणचे कर्मचारी अभियंते रात्रीअपरात्री, उन, वारा, पावसात काम करून प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असतात. वीजदुरुस्तीची कामे करताना विदयुत अपघाताचा धोका तर असतो, परंतु अनेक परिस्थिती अशाही उद्भवतात की जेथे शारीरिक इजा व प्रसंगी जिवावर बेतते.

हेही वाचा – ‘सामान बेचो’ आंदोलन करीत हाताला काम नसलेल्यांनी केला निषेध

रानटी पशू, साप, विंचूसारखे सरपटणारे तर कधी रानडुक्कर, वाघ, बिबटे अशा प्राण्यांच्या व आता हत्तींच्या भितीतही काम करून वीजपुरवठा पूर्ववत करावा लागतो. त्याच प्राण्यांमुळे एकीकडे वीजपुरवठा खंडीत होऊन अंधार झाल्याने ग्रामस्थांना धोका असतो, तर नेमके त्याचवेळी त्याच प्राण्यांमुळे वीजदुरुस्ती करणाऱ्या महावितरणच्या अभियंता व जनमित्रांना धोका असतो. परंतु वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे कर्तव्य जनमित्र व अभियंते पार पाडत असतात.

Story img Loader